शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास !

By श्याम बागुल | Updated: September 27, 2019 19:39 IST

‘आधीच उल्हास त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी परिस्थिती नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाची झाली आहे. गेल्या वर्षी विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे बराच कालावधी आचारसंहितेत गेला परिणामी जिल्हा परिषदेचे विविध खात्यांसाठी केलेली तरतूद वेळेत खर्ची पडू शकली नाही.

ठळक मुद्दे मार्च ते मे महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हातावर हात धरून पदाधिका-यांच्या हेतू विषयी शंका घेण्याइतपत परिस्थिती

श्याम बागुलजिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना शासनाने चार महिन्यांची मुदतवाढ दिल्याने उर्वरित काळात विकासाची कामे करण्यास प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही देतांनाच त्याच बरोबर गेल्या अडीच वर्षात काहीच कामे होवू शकली नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच दिली. त्यामुळे येत्या चार महिन्यात जिल्हा परिषदेच्या विकासाची ट्रेन सुपरफास्ट धावेल अशी अपेक्षा बाळगली जात असताना त्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने वेग घेण्याच्या तयारीत असलेल्या सुपरफास्ट ट्रेनचे पॅसेंजरमध्ये रूपांतर झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा गुलाल धूवून निघत नाही तो पदाधिकारी व सदस्यांचे जिल्हा परिषदेला पाय लागणार नाहीत, अशा परिस्थितीत विकास कामांचे काय होणार असा निरर्थक प्रश्न विचारण्यात काही हाशिलही नाही.

‘आधीच उल्हास त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी परिस्थिती नाशिक जिल्हा परिषदेच्या कामकाजाची झाली आहे. गेल्या वर्षी विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे बराच कालावधी आचारसंहितेत गेला परिणामी जिल्हा परिषदेचे विविध खात्यांसाठी केलेली तरतूद वेळेत खर्ची पडू शकली नाही. त्यामुळे शासनाकडे सुमारे ९५ कोटी रूपयांचा निधी परत पाठविण्याची नामुष्की पदाधिकाऱ्यांबरोबरच अधिका-यांवरही ओढवली. यंदा मात्र तसे काही होवू नये व अडीच वर्षे कारकिर्दीतील शेवटचे वर्ष जलदगती व पारदर्शी निर्णयाने गाजावे असा विचार केलेल्या पदाधिका-यांना मार्च ते मे महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हातावर हात धरून बसावे लागले. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या सावटाखाली जून महिन्यात कामकाजाला सुरूवात करताना हाती असलेल्या दिवसात काय करू नी काय नको अशी अवस्था पदाधिका-यांची झालेली असली तरी, प्रशासनातील अधिका-यांना मात्र त्यांचे गांभीर्य कितपत होते हा प्रश्नच होता. तसे नसते तर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभा अधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे तहकूब कराव्या लागल्या नसत्या. एवढे करूनही जलदगतीने निर्णय घेवून त्याची पारदर्शी अंमलबजावणी झाली असा छातीठोक दावा कोणीही करू शकणार नाही. कारण विधानसभेची आचारसंहिता जारी होण्याच्या आठवडाभर अगोदर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खाते प्रमुखांची सुरू असलेली धावपळ व त्यांना ठेकेदारांना घातलेला गराडा पाहता नेमके काय चालले होते याची कल्पना यावी. एवढे करूनही आचारसंहितेच्या कचाट्यात अनेक कामे अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक कामे मंजुर होवूनही त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत, तर वैयक्तीक लाभाच्या योजनांना नियम, निकषाचा खोडा बसला आहे. रस्ते, शाळा दुरूस्ती असो की आरोग्य केंद्रांची उभारणी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली. विकास कामांना आचारसंहितेचा फटका बसलाच बसला त्याच बरोबर जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारितील बाबीही लांबणीवर पडल्या आहेत. या साºया गोष्टींना अधिकारीच जबाबदार आहेत असे नव्हे तर पदाधिकारी व सदस्यांकडूनही त्यात अनेक मार्गाने खोडा घालण्यात आला आहे. प्रत्येक प्रशासकीय कामासाठी सदस्यांना विश्वासात घेण्याची केल्या जाणा-या मागणीतून सदस्य, पदाधिका-यांच्या हेतू विषयी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. असाच कारभार यापुढे चालणार असेल तर शासनाने जिल्हा परिषद पदाधिकाºयांना आणखी पाच वर्षाचा कार्यकाळ वाढवून दिला तरी तो अपुराच पडणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद