शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

आम्हास इच्छामरणाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 1:04 AM

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी या शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्दे ग्रामसभेत ठरावसमृद्धीबाधितांची राष्ट्रपतींकडे मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकरी गेल्या २७ महिन्यांपासून आंदोलन करत असून, ऐन दसºयाच्या दिवशी ज्या अवचितवाडीमध्ये समृद्धीनामक राक्षसाचे दहन केले होते. तेथील शेतकरी आता आक्रमक झाले असून, ग्रामसभा घेत थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी या शेतकºयांनी केली आहे.स्वातंत्र्यपूर्वकाळापासून इगतपुरी तालुक्याने खूपच यातना सोसून राष्ट्राच्या हितावह जमिनी देण्याचं काम करून विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे येथील शेतकरी हा कधीही विकासविरोधी नाही; परंतु मुख्यमंत्र्यांनी महत्त्वकांक्षी केलेल्या समृद्धी प्रकल्पात शासनाने संपादन केलेल्या जमिनी जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अनेक महिन्यांपासून आंदोलन करत या प्रकल्पाला कधी नव्हे इतका विरोध तालुक्यातून होत आहे. विशेष बाब म्हणजे हा विरोध राजकीय नसून सर्व तरुण शेतकरी मिळून करत आहेत. या ग्रामसभेत दौलत दुभाषे, गुरुनाथ दुभाषे, गोरख हाडके, दादा कडू, हरिश्चंद्र दुभाषे, मुरलीधर दुभाषे, तुकाराम कडू, शिवराम कडू, प्रकाश कडू, कैलास दुभाषे, निवृत्ती दुभाषे, सखाराम दुभाषे, मदन बिन्नर, ज्ञानेश्वर कडू, कारभारी दुभाषे इत्यादी शेतकºयांनी ठरावावर सह्या केल्या आहेत.गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शासनस्तरावर भांडत असून, आमची प्रामाणिक इच्छा आहे की, सरकारने हा प्रकल्प जरूर करावा मात्र तो भूसंपादन २०१३नुसार सर्व सोपस्कर पूर्ण करून. परंतु शासन मात्र हे करताना दिसत नाही व शेतकºयांमध्ये बुद्धिभेद करून आमच्या जमिनी कवडीमोल भावात घेत आहे. ज्या अवचितवाडी गावात रेडीरेकनरच्या भावात मोठी तफावत जाणवत आहे तर प्रचलित बाजारभाव एक कोटी रुपये असताना सर्वात कमी दर देऊन जर जमिनी घेण्यात येणार असतील तर त्यापेक्षा मरण पत्करू; परंतु जमिनी देणार नाही.- भास्कर गुंजाळ, अध्यक्ष, समृद्धीबाधित संघर्ष समिती, इगतपुरी