शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरचा ‘ड’ वर्गवारीत समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:51 IST

राज्य शासनाने तालुकानिहाय वर्गीकरण करताना सिन्नर तालुक्याचा समावेश ‘क’ वर्गवारीत केल्याने तालुक्यातील औद्योगिक विकास खुंटला आहे. थांबलेल्या या विकासाला गती देण्यासाठी ‘ड प्लस’ वर्गीकरणासाठी आज असलेले व भविष्यात लागू होणारे सर्व प्रकारचे फायदे तालुक्यात सात वर्षासाठी लागू करावेत व या मागणीचा समावेश नवीन औद्योगिक धोरण-२०१८ मध्ये करावा, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी राज्याचे उद्योग सहसचिव संजय देगावकर यांना पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देराजाभाऊ वाजे यांचे उद्योग सहसचिवांना पत्र

सिन्नर : राज्य शासनाने तालुकानिहाय वर्गीकरण करताना सिन्नर तालुक्याचा समावेश ‘क’ वर्गवारीत केल्याने तालुक्यातील औद्योगिक विकास खुंटला आहे. थांबलेल्या या विकासाला गती देण्यासाठी ‘ड प्लस’ वर्गीकरणासाठी आज असलेले व भविष्यात लागू होणारे सर्व प्रकारचे फायदे तालुक्यात सात वर्षासाठी लागू करावेत व या मागणीचा समावेश नवीन औद्योगिक धोरण-२०१८ मध्ये करावा, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी राज्याचे उद्योग सहसचिव संजय देगावकर यांना पत्राद्वारे केली आहे.शासनाने पूर्वी सिन्नर तालुक्याचा समावेश विकास केंद्रामध्ये केलेला होता. परंतु नंतर ते रद्द करण्यात आल्याने सिन्नर तालुक्यातील उद्योगांना एक जादा वर्गवारीचे मिळणारे फायदेदेखील बंद झाले आहेत. औरंगाबाद तालुक्यात चिखलठाणा, वाळुंज व शेंद्रा अशा तीन मोठ्या शासकीय औद्योगिक वसाहती विकसित झालेल्या असताना व तेथे विमानतळ, रेल्वे स्टेशन, सिडको, म्हाडा इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध होऊनही त्याचा तालुकानिहाय वर्गीकरणामध्ये ‘ड’ वर्गवारीत समावेश करण्यात आलेला आहे. सिन्नर तालुक्यात एक लघुउद्योगाची सहकारी औद्योगिक वसाहत व एक शासकीय औद्योगिक वसाहत आहे. आज या दोन्ही औद्योगिक वसाहतींमधील ४० टक्के उद्योग बंद आहेत. तालुक्यातील मुसळगाव व गुळवंच शिवारात २५०० एकरावर इंडिया बुल्स कंपनीचे विशेष आर्थिक क्षेत्र विकसित होत असून, ते बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोणतेही औद्योगिक विकासाचे व रोजगार निर्मितीचे काम न झाल्यामुळे सिन्नर तालुक्याचे वर्गीकरण ‘क’ वर्गवारीत ठेवणे व त्याच वर्गवारीचे आर्थिक फायदे उद्योगांना देणे ही बाब सिन्नरच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पूर्णपणे मारक व अन्यायकारक असल्याचे पत्रात म्हटले आहे.सिन्नर तालुका १९७२ पासून कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. पर्जन्यमान कमी, त्यामुळे शेती व्यवसाय नाही. अशा परिस्थितीत तालुक्यात दरवर्षी शेकडो बेरोजगार उच्चशिक्षित तरुणांची भरच पडत आहे. त्यांना नोकरी-व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध नाहीत ही तालुक्यातील सत्य परिस्थिती आहे. दरम्यान तरुणांनी आपल्या भागातच उद्योग-व्यवसाय करावा व शहराकडे धाव घेऊ नये, असे शासनाचे धोरण आहे. परंतु ते धोरण परिणामकारक राबवयाचे असेल तर ग्रामीण भागात उद्योग-व्यवसायासाठी पोषक वातावरण व सुविधा निर्माण करणे हे शासनाचे काम असल्याचे म्हटले आहे. मध्यंतरीचे काळात शासनाने उद्योगांना चालना देण्यासाठी बऱ्याच नियमामध्ये शिथिलता आणून काही अटी काढून टाकल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना उद्योगाकडे वळण्याचा कल पाहता काही अधिकच्या सवलती देणे आवश्यक आहे.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकMLAआमदार