शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शंका फेटाळताना सक्रिय परतीचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:15 IST

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या वेगळ्या वाटचालीबाबतच्या वावड्यांना तर पूर्णविराम दिलाच, परंतु सहमतीच्या राजकारणाचा मुद्दा अधिक विस्तृत करीत देशपातळीवर त्याची गरज प्रतिपादित केली. शिवाय ‘हम बचेंगे भी और लढेंगे भी’ अशी गर्जनाही त्यांनी केल्याने लवकरच ते पूर्ववत राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळून गेले आहेत.

किरण अग्रवाल/नाशिकनाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या वेगळ्या वाटचालीबाबतच्या वावड्यांना तर पूर्णविराम दिलाच, परंतु सहमतीच्या राजकारणाचा मुद्दा अधिक विस्तृत करीत देशपातळीवर त्याची गरज प्रतिपादित केली. शिवाय ‘हम बचेंगे भी और लढेंगे भी’ अशी गर्जनाही त्यांनी केल्याने लवकरच ते पूर्ववत राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळून गेले आहेत.सुमारे अडीच वर्षे तुरुंगात राहून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या हल्लाबोल कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त प्रथमच भुजबळ यांनी जाहीर सभेस संबोधित केले. त्यामुळे ते काय बोलतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. भुजबळांनी या औत्सुक्याला साजेसे व आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करून त्यांच्या संबंधीच्या शंका-कुशंकांना धुडकावण्याची संधी घेतली. त्यांना अटक झाल्यानंतर पक्षाने व विशेषत: पवार यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असा सूर भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त केला जात असे, पण खुद्द भुजबळ यांनीच त्यासंबंधी स्पष्टता करून आपल्या अटक काळात पवार यांनीच कुटुंबीयांची काळजी घेतल्याचे सांगितले. त्यामुळे याबाबतीतील मळभ दूर व्हावे.छगन भुजबळ यांच्या जामिनावर सुटकेनंतर आमदार पंकज भुजबळ आभारासाठी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आले होते, तर ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनीही भुजबळांची भेट घेतली होती, त्यामुळे शिवसेनेशी त्यांचे पुन्हा सूत जमते की काय अशी शंका घेतली जाऊ लागली होती. याच बरोबर पक्षासंबंधीच्या त्यांच्या नाराजीची शक्यता लक्षात घेऊनच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी मुंबईत त्यांची भेट घेतली असता त्यांनी तर चक्क भुजबळ यांना काँग्रेस पक्षात प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. परंतु पवार यांचे कार्य व त्यांचे पाठबळ स्पष्ट करुन त्यासंबंधीच्या चर्चाही भुजबळ यांनी साफ फेटाळून लावताना, उलट पक्षात राहून चुका सुधारण्याची भूमिका मांडली.गतकाळात भुजबळ यांना राजकीय विरोध करणारे सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे व त्यांचे समर्थक भुजबळांच्या सुटकेनंतर अलीकडे त्यांना भेटावयास मुंबईत गेले असता, त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय सहमतीचा मुद्दा मांडला होता. तोच मुद्दा पुण्यातील सभेत व्यापक रूपात पुढे नेत त्यांनी देशात भाजपेतर पक्षांच्या तसेच नेत्यांच्या सहमती व सोबतीची गरज प्रतिपादित करीत पवार यांच्या नेतृत्वात ते शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. खुद्द भुजबळ यांनी विविध राज्यांत समता परिषदेचे घेतलेले मेळावे व केलेले ओबीसींचे संघटन पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांची सक्रिय भूमिका राहण्याची अपेक्षाही यामुळे बळावून गेली आहे. विशेषत: ‘शेर कभी घास खाता नहीं’ व ‘बंदर बुढा हुआ तो भी गुलाटी मारना छोडता नहीं’ असे दाखलेही त्यांनी दिल्याने त्यांच्या सक्रियतेची स्पष्टता होऊन गेली आहे.आता लक्ष नाशकातील आगमनाकडेभुजबळ यांनी जामिनावर सुटकेनंतर प्रथमच मुंबईबाहेर पडून पुण्यातील जाहीर सभेत मार्गदर्शन केले असले तरी त्यांचे अजून नाशकात येणे झालेले नाही. त्यांना मुंबईत भेटावयास गेलेल्या अनेकांशी बोलताना त्यांनी त्यांचा मतदारसंघ येवल्यात येण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. पुण्यातील सभेत बोलतानाही त्यांनी येवल्याचा उल्लेख केला. त्यामुळे आता त्यांचे होमग्राउंड असलेल्या नाशिक व येवल्यातील आगमनाकडे साºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळ