शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

अपघातप्रवणक्षेत्र बनले साईभक्तांसाठी मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:28 IST

सिन्नर-शिर्डी महामार्गावर गेल्या दोन वर्षात शंभराहून अधिक साईभक्तांसह प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर ते शिर्डी या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर वेडीवाकडी वळणे व अपघातप्रवणक्षेत्र साईभक्त व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच बनले आहेत. सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रारंभ होत आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यासह अन्य तयारी झाली पूर्ण झाली आहे. या महामार्गासाठी चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ करताना सिन्नर-शिर्डी महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’ कडे लक्ष देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसिन्नर-शिर्डी महामार्ग । अपघात टाळण्यासाठी चौपदरीकरणाच्या कामात काळजी घेण्याची गरज

शैलेश कर्पे ।सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर गेल्या दोन वर्षात शंभराहून अधिक साईभक्तांसह प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर ते शिर्डी या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर वेडीवाकडी वळणे व अपघातप्रवणक्षेत्र साईभक्त व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच बनले आहेत.सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रारंभ होत आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यासह अन्य तयारी झाली पूर्ण झाली आहे. या महामार्गासाठी चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ करताना सिन्नर-शिर्डी महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’ कडे लक्ष देण्याची गरज आहे.

आजपर्यंत शेकडो साईभक्त प्रवाशांना शिर्डीला जाताना किंवा येतांना प्राण गमवावे लागले असून, शेकडोजणांना अपघातात अपंगत्व आले आहे. त्यामुळे या महामार्गावरील वळणे पूर्णपणे काढून टाकण्यासह अपघातप्रवणक्षेत्रावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाढत्या अपघातामुळे सिन्नर-शिर्डी रस्ता चर्चेत आला होता. त्यामुळे या रस्त्याचे सात वर्षांपूर्वी रुंदीकरण करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही अपघाताचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढले होते. वाढती वाहनांची संख्या व वेग यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी व जायबंदी होण्याचे प्रमाण वाढल्याने चौपदरीकरणात अपघात टाळण्यासाठी आतपासूनच काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.५१ किलोमीटरचा रस्ता होणार चौपदरीसिन्नर-शिर्डी महामार्गापैकी ५१ किलोमीटर रस्ता चौपदरी होणार आहे. यासाठी एजन्सीला काम देण्यात आले आहे. ठेकेदाराने कामास काही प्रमाणात प्रारंभ केला आहे. राष्टÑीय महामार्गाच्या कामासाठी गेल्यावर्षीच ७८२ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा महामार्ग नाशिक व अहमदनगर या दोन महामार्गांना जोडणारा आहे. चौपदरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासह सिन्नरहून शिर्डीला सुमारे ४५ मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे. या चौपदरीकरणामुळे अपघाताची संख्या कमी होण्याची अपेक्षा आहे.साई पदयात्रेकरुंसाठी स्वतंत्र पालखी मार्गाची गरजमुंबई, दादर, ठाणे, कल्याण या महानगरांसह त्यांच्या उपनगरातून व नाशिक व गुजरात राज्यातून दरवर्षी शेकडो पालख्यांसह हजारों साईभक्त शिर्डीला पायी येत असतात. शिर्डीला पायी जाताना सिन्नर-शिर्डी महामार्गावर आतापर्यंत अनेक पदयात्रेकरुंना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहे किंवा अपंगत्वही आले आहे. त्यामुळे पायी दिंडीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग असावा अशी अनेक दिवसांपासून मागणी आहे. त्यादृष्टीने काही प्रयत्नही झाले होते. सिन्नर-शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरण करताना पायी पालखी मार्गाचा विचार होण्याची गरज आहे.अपघात टाळण्यासाठी वावी पोलिसांकडून प्रबोधनसिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वावी पोलिसांकडून प्रबोधन केले जाते. पायी पदयात्रेंकरुंनी उजव्या बाजूने चालावे असे फलक लावण्यासह विविध प्रबोधनात्मक फलकही लावण्यात आले होते, मात्र त्याचा फारसा उपयोग झालानाही. देवपूर फाटा व पांगरी शिवारातील ‘ब्लॅक स्पॉट’वर अपघातग्रस्त वाहने उभीकरुन ‘ज्यांना घाई .. ते निघून गेले’ अशा आशयाचे फलक लावून प्रबोधनही करण्यातआले आहे. त्यानंतरही वाहनचालकांकडून आपल्या एक्सलेटरवरचा पाय कमी झालेलादिसत नाही.ही आहेत अपघातप्रवणक्षेत्र..सिन्नर-शिर्डी या ६० किलोमीटर अंतरात अनेक अपघातप्रवणक्षेत्र आहेत. याठिकाणी नेहमी अपघात होऊन प्रवाशांना प्राण गमवावे लागतात. सिन्नरपासून निघाल्यानंतर जुन्या केला कंपनीजवळ वळण, सामाजिक वनीकरणाच्या कार्यालयजवळ वळण, केदारपूर शिवारात आम्रपालीजवळ देवनदीजवळील वळण, खोपडी शिवारातील दत्तमंदिराजवळचा स्पॉट, देवपूर फाटा, पांगरी शिवारातील बाबाज् ढाब्याजवळील वळण, वावी ते पांगरीदरम्यान असलेली वळणे, पाथरे गावाजवळ नदीजवळ असलेले वळण, दर्डे शिवारात गोदावरील कालव्याजवळील वळण ही महत्त्वाची अपघातप्रवण क्षेत्र असून चौपदरीकरणात याठिकाणी अपघात टाळण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा