शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
4
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
5
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
6
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
7
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
8
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
9
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
10
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
11
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
12
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
13
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
14
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
15
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
16
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
17
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
18
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
19
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
20
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला गत सप्ताहात ७७,४३७ क्विंटल कांद्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 23:39 IST

कळवण : सध्या एकूणच महाराष्ट्रात पाऊस येण्याची अपेक्षा कायम असून, नवीन कांदा येण्याचे वेध लागलेले असताना साठविलेला कांदा चाळीत खराब होत आहे. त्यात कांदा बाजारभाव वाढत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकरी दिवसाआड कांदा ट्रॅक्टर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे.

ठळक मुद्दे कांद्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला

कळवण : सध्या एकूणच महाराष्ट्रात पाऊस येण्याची अपेक्षा कायम असून, नवीन कांदा येण्याचे वेध लागलेले असताना साठविलेला कांदा चाळीत खराब होत आहे. त्यात कांदा बाजारभाव वाढत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकरी दिवसाआड कांदा ट्रॅक्टर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे.चालू वर्षी कांद्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला. मात्र, आता आर्थिक गरज ओळखून शेतकरी कांदा विक्री करत आहेत.मालाच्या प्रतवारीनुसार दर मिळत असल्याने, शेतकरी कांदा विक्रीचा निर्णय घेत आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याने, काही कांदा चाळी खराब होत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी शरद देवरे यांनी सांगितले.कांद्याची आवक जरी वाढत असली, तरी बाजारभावात थोडी-फारही भाव वाढ झालेली दिसून येत नाही. सरासरी १,५०० ते १,७०० रुपये भाव मिळाला. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्या तरी स्थिर राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.कळवण बाजार समितीमध्ये गत सप्ताहात कांद्याची ७७,४३८ क्विंटल आवक होती. त्यात सोमवारी १५,५९७ क्विंटल, मंगळवारी १६,५०५ क्विंटल, बुधवारी ७,१८३ क्विंटल, गुरुवारी १९,४१८ क्विंटल, शुक्रवारी १२,२३५ क्विंटल, शनिवारी ६,५०० क्विंटल आवक होती. कमीतकमी ३०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीतजास्त १,७६० ते १,९५५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला असून, सरासरी १,५०० ते १,७०० क्विंटल भाव मिळाला.कळवण बाजार समितीमध्ये कळवण (नाकोडा ) अभोणा व कनाशी उपआवारात चांगल्या कांद्याला चांगला दर मिळाला असला, तरी शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे. कांद्याचे दर वाढले पाहिजेत, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.कांदा बियाणे टंचाई, बियाणे दरवाढ, कमी झालेले लागवड क्षेत्र, पुढे लागवडीच्या पश्चात अवकाळी पाऊस व गारपीट अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले.परिणामी, नैसर्गिक आपत्तीमुळे गुणवत्ता व उत्पादकतेवर परिणाम झाला . त्यामुळे तालुक्यातही उत्पादन घटले.त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज अडचणीत आले. अशा अडचणीच्या काळात आता केंद्र सरकारचे अस्थिर निर्यात धोरण, इंधन दरवाढ, कंटेनर भाडेवाढ यासह दक्षिण भारतातील कांदा उत्पादक पट्ट्यातून होणारी आवक अशा कारणांमुळे ऑगस्ट महिन्यात आवक कमी होऊनही कांदा दर स्थिर आहेत.कांदा लावताना बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन-कांदा म्हटलं की, योग्य नियोजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी न केल्यास वांदे होतात. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राच्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्याची गरज समोर आलीय. नियोजनासोबत बीज प्रक्रिया महत्त्वाची असून, यातून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढविणे शक्य असल्याने, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच रोपे टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Marketबाजारonionकांदा