शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला गत सप्ताहात ७७,४३७ क्विंटल कांद्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 23:39 IST

कळवण : सध्या एकूणच महाराष्ट्रात पाऊस येण्याची अपेक्षा कायम असून, नवीन कांदा येण्याचे वेध लागलेले असताना साठविलेला कांदा चाळीत खराब होत आहे. त्यात कांदा बाजारभाव वाढत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकरी दिवसाआड कांदा ट्रॅक्टर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे.

ठळक मुद्दे कांद्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला

कळवण : सध्या एकूणच महाराष्ट्रात पाऊस येण्याची अपेक्षा कायम असून, नवीन कांदा येण्याचे वेध लागलेले असताना साठविलेला कांदा चाळीत खराब होत आहे. त्यात कांदा बाजारभाव वाढत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकरी दिवसाआड कांदा ट्रॅक्टर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे.चालू वर्षी कांद्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला. मात्र, आता आर्थिक गरज ओळखून शेतकरी कांदा विक्री करत आहेत.मालाच्या प्रतवारीनुसार दर मिळत असल्याने, शेतकरी कांदा विक्रीचा निर्णय घेत आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याने, काही कांदा चाळी खराब होत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी शरद देवरे यांनी सांगितले.कांद्याची आवक जरी वाढत असली, तरी बाजारभावात थोडी-फारही भाव वाढ झालेली दिसून येत नाही. सरासरी १,५०० ते १,७०० रुपये भाव मिळाला. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्या तरी स्थिर राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.कळवण बाजार समितीमध्ये गत सप्ताहात कांद्याची ७७,४३८ क्विंटल आवक होती. त्यात सोमवारी १५,५९७ क्विंटल, मंगळवारी १६,५०५ क्विंटल, बुधवारी ७,१८३ क्विंटल, गुरुवारी १९,४१८ क्विंटल, शुक्रवारी १२,२३५ क्विंटल, शनिवारी ६,५०० क्विंटल आवक होती. कमीतकमी ३०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीतजास्त १,७६० ते १,९५५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला असून, सरासरी १,५०० ते १,७०० क्विंटल भाव मिळाला.कळवण बाजार समितीमध्ये कळवण (नाकोडा ) अभोणा व कनाशी उपआवारात चांगल्या कांद्याला चांगला दर मिळाला असला, तरी शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे. कांद्याचे दर वाढले पाहिजेत, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.कांदा बियाणे टंचाई, बियाणे दरवाढ, कमी झालेले लागवड क्षेत्र, पुढे लागवडीच्या पश्चात अवकाळी पाऊस व गारपीट अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले.परिणामी, नैसर्गिक आपत्तीमुळे गुणवत्ता व उत्पादकतेवर परिणाम झाला . त्यामुळे तालुक्यातही उत्पादन घटले.त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज अडचणीत आले. अशा अडचणीच्या काळात आता केंद्र सरकारचे अस्थिर निर्यात धोरण, इंधन दरवाढ, कंटेनर भाडेवाढ यासह दक्षिण भारतातील कांदा उत्पादक पट्ट्यातून होणारी आवक अशा कारणांमुळे ऑगस्ट महिन्यात आवक कमी होऊनही कांदा दर स्थिर आहेत.कांदा लावताना बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन-कांदा म्हटलं की, योग्य नियोजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी न केल्यास वांदे होतात. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राच्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्याची गरज समोर आलीय. नियोजनासोबत बीज प्रक्रिया महत्त्वाची असून, यातून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढविणे शक्य असल्याने, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच रोपे टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Marketबाजारonionकांदा