शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २२ हजार बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:10 IST

जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांमध्ये कुपोषणाची समस्या अद्यापही कायम असून, डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत सुमारे २२ हजार बालकांचे वजन कमी आढळून आले आहे.

ठळक मुद्देशहरी भागातही लोण : आदिवासी विभागात समस्या गंभीर

नाशिक : जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांमध्ये कुपोषणाची समस्या अद्यापही कायम असून, डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत सुमारे २२ हजार बालकांचे वजन कमी आढळून आले आहे. विशेष म्हणजे आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर असताना आता शहरी व सुखवस्तू भागातही कुपोषित बालके आढळून आल्याने आरोग्य व महिला, बाल कल्याण विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.नाशिक जिल्ह्यात आठ आदिवासी तालुके असून, या भागातील नागरिक शेती व शेतमजुरीवर अवलंबून असल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यातही पोटभर अन्नपाणी मिळण्यापेक्षाही आरोग्याविषयी अनास्था, अल्पवयात लग्न व गर्भारपण व त्यातूनच कुपोषित बालकांना जन्म देण्याचे प्रमाण अधिक आहे. पोटापाण्यासाठी गावोगावी करावे लागणारे स्थलांतर, आरोग्य सुविधांचा अभाव या गोष्टीही कुपोषणाला पूरक ठरल्या आहेत. कुपोषण निर्मूलनासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न करूनही आदिवासी भागात कुपोषित बालकांना जन्म देण्याच्या परिस्थितीत फारसा फरक पडत नसला तरी, आरोग्य विभाग व महिला-बाल कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे कमी वजनाच्या बालकांचे वजन वाढविण्यात यश मिळाले आहे. मात्र पूर्वी फक्त आदिवासी भागापुरताच मर्यादित असलेला कुपोषणाचा विळखा आता बिगर आदिवासी तालुके व शहरी भागालाही बसू लागला आहे. डिसेंबर महिन्यात बिगर आदिवासी तालुक्यातील शून्य ते पाच वयोगटातील ३ लाख १८ हजार ६६० बालकांच्या करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या ३७८६६ इतकी होती तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या १०१५६ इतकी राहिली. मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २८२४ इतकी आहे तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या ६६३ इतकी आहे. आदिवासी क्षेत्रातील एक लाख ५६ हजार ७१८ बालकांपैकी एक लाख ५० हजार ९८१ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यात मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या २४२१६ इतकी असून, तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या ६९४८ तर मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २०३८ इतकी आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्या ४७८ इतकी असून, आदिवासी व बिगर आदिवासी तालुक्यातील बालकांची एकूण संख्या पाहता सुमारे २२ हजार बालके कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. कुपोषित बालकांची संख्या लक्षात घेता कमी वजनाच्या बालकांना आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, याशिवाय अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार व आशा कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवून त्यांचे वजन वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.शहरी भागाला विळखाजिल्ह्णातील बिगर आदिवासी तालुक्यांमध्येही कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले असून, सर्वाधिक कुपोषित बालके नांदगाव तालुक्यात ४९८ इतकी आढळली आहेत. त्याखालोखाल बागलाण (३५९), मालेगाव (३३६), चांदवड (२९०), निफाड (२६४), मनमाड (२५५) बालके कुपोषित आढळून आली आहेत.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाfoodअन्न