आडगावला शेतकऱ्यांना ४० पट दंडाच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:22 IST2018-11-15T00:21:37+5:302018-11-15T00:22:50+5:30
आडगाव परिसरातील शेतजमिनींचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने नाशिक तहसील कार्यालयाने परिसरातील शेतकºयांना ४० पट दंड आकारणीच्या नोटिसा बजावल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे.

आडगावला शेतकऱ्यांना ४० पट दंडाच्या नोटिसा
आडगाव : आडगाव परिसरातील शेतजमिनींचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने नाशिक तहसील कार्यालयाने परिसरातील शेतकºयांना ४० पट दंड आकारणीच्या नोटिसा बजावल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेऊन दंडाची वसुली थांबविण्याच्या मागणीसाठी साकडे घातले आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतीत केलेला खर्च काढणे मुश्कील झाले असून, शेतीव्यवसाय धोकादायक झाला आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहे. अशा परिस्थितीत तुटपुंज्या मिळणाºया उत्पन्नावर आधारित पंक्चर दुकान, चहाची टपरी, मिसळचा गाडा, पानटपरी असे व्यवसाय सुरू केले असून, त्यातून तोकडे उत्पन्न मिळत असताना तहसीलदार यांनी सदर जागा बिनशेती नसल्याने ४० पट दंडाची आकारणी केलेल्या नोटिसा बजावल्या
आहे. दंडाची कारवाई करताना शेतकºयांना क्षेत्र मोजलेले नाही. शिवाय काही लोकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरणे दाखल केली असून, त्याचा निर्णय अजून झालेला नाही. नोटीस प्राप्त झाल्यानंतर याबाबत विचारणा केली असता बिनशेती प्रकरणे मनपाकडे वर्ग केले असल्याचे सांगण्यात येते. याबाबत मनपाकडे विचारणा केली असता नवीन प्रकरण दाखल करा मग विचार करू अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देऊन छळवणूक केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक सुरेश खेताडे, नितीन माळोदे, पोलीस पाटील एकनाथ मते, प्रकाश शिंदे, सुरेश मते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
अस्थायी बांधकाम असल्याचा दावा
शेतकºयांनी व्यवसाय सुरू केले असले तरी पक्के बांधकाम केलेले नसून ते अस्थायी स्वरूपाचे आहे. अशा परिस्थितीत ४० पट दंड आकारणी करून शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात असल्याचे म्हटले आहे.