शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

तीन दिवसांत ३१२ कोटींची गंगाजळी?

By admin | Updated: November 19, 2016 00:56 IST

अच्छे दिन : नोटाबंदीचा परिणाम

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला चलनातील ५०० व १०००च्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे दिसू लागली होती. ११ ते १३ या तीन दिवसांत जिल्हा बॅँकेच्या गंगाजळीत घसघशीत ३१२ कोटींची वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसूून येते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला गेल्या वर्षी पीककर्जाची वसुली करण्यास सरकारनेच बंदी घातल्यानंतर पीककर्ज वसुलीचा वेग मंदावला होता. एकूण पीककर्जाच्या अवघे ६० टक्के पीककर्ज वसुली झाली होती. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पीककर्ज वसुली चांगली होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात यावर्षीही पीककर्ज वसुलीचा वेग मंदावलेलाच होता. त्यातच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १०००च्या नोटा रद्द करण्याचा रातोरात निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागासह शहरी भागातील उच्च मध्यमवर्गीय व उच्चभ्रू व्यक्तींना धक्का बसल्याची चर्चा होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून तोपर्यंत ११ नोव्हेंबरपासून चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा इतर बॅँकांमध्ये स्वीकारण्यात येत होत्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी सुमारे ७९ कोटींहून अधिक रक्कम बचत व चालू खात्यात जमा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसऱ्या दिवशी १५१ कोटी, तर तिसऱ्या दिवशीही बॅँकेत रक्कम जमा होण्याचा वेग कायम होता.(प्रतिनिधी)