शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

‘त्या’ ठरावांसंदर्भात महापौरांना तीस दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:58 AM

पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणची देखभाल व दुरुस्तीसंदर्भात महासभेने नामंजूर केलेला ठराव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडे पाठवून निलंबित केला होता. त्यावर अपील करण्यासाठी महापौरांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

नाशिक : पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणची देखभाल व दुरुस्तीसंदर्भात महासभेने नामंजूर केलेला ठराव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडे पाठवून निलंबित केला होता. त्यावर अपील करण्यासाठी महापौरांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याबाबत मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने नगरसचिव कार्यालयास पत्र सादर केले आहे. मनपा क्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्थेची व्यापक पध्दतीने देखभाल दुरुस्ती करण्याचा विषय गेल्या जुलैमध्ये झालेल्या महासभेत सादर केला होता.   त्याचप्रमाणे मलवाहिकांचा विषयदेखील पाठविला होता. परंतु आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाठविलेले दोन्ही प्रस्ताव नामंजूर करण्यात आले होते. त्यावर आयुक्तांनी सदरचे ठराव महापालिकेच्या हिताचे नसल्याचे आपले मत मांडत दोन्ही ठराव शासनाकडे पाठविले होते. शासनाने १२ आॅक्टोबर रोजी महासभेचा ठराव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ४५१(१) अन्वये निलंबित करण्याचा आदेश दिला.शासनाच्या या निर्णयाविरुद्ध अभिवेदन (अपील) करावयाचे असल्यास आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांत करण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर हा ठराव पूर्णत: विखंडित होणार आहे.मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील देखभाल व दुरुस्तीची कामे सध्या विभाग तसेच प्रभागनिहाय निविदाप्रक्रि या राबवून करून घेण्यात येतात. त्याअंतर्गत पाइपलाइन व व्हॉल्व, चेंबर्स यांची दुरुस्ती करणे, तसेच पंपिंगस्टेशन व जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत यंत्रांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. सदरची कामे खासगीकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र महापालिकेने प्रस्ताव नामंजूर केला. त्यावर आयुक्तांनी शासनाकडे नामंजूर ठराव सादर करत विखंडनासाठी प्रस्ताव सादर केला. त्यात बाह्य यंत्रणेद्वारे काम करताना दुरुस्ती वा इतर कामांना बाह्य यंत्रणेमार्फत तत्पर सेवा मिळू शकते, वितरण व्यवस्थापन व देखभाल दुरुस्तीचे व्यवस्थापन करताना बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध झाल्यास मनपाच्या अभियंता, इतर तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांना मनपाची भांडवली कामे करता येऊ शकतात. कमी काळात जास्त चांगल्या पद्धतीची सेवा घेऊन नागरिकांना तत्परसेवा देणे शक्य होईल. सहाही विभागात सारख्याच प्रकारचे व्यवस्थापन असल्याने पाणी वितरणात सुसूत्रता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. ते शासनाला दिलेल्या प्रस्तावात मांडण्यात आले आहे. आता शासनाच्या भूमिकेकडे लक्ष आहे.महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे महापालिकेला नवीन भरतीप्रक्रि या राबविणे शक्य होत नाही. त्यात महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी निवृत्त होत असल्याने मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा स्थितीत बाह्य यंत्रणेमार्फत पाणीपुरवठा वितरणाची कामे करणे आवश्यक असल्याचे म्हणणे प्रशासनाने पटवून दिल्याने महासभेचे दोन्ही ठराव शासनाने निलंबित केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे