शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शहरात १६.२मिमी पाऊस; 'अवकाळी'चा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 9:10 PM

हवामान बदलामुळे यंदा चक्क जानेवारीत पावसाचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. शनिवारी दिवसभर नागरिकांना उष्माही जाणवला. कारण कमाल तापमानाचा पारा २९.३ अंशापर्यंत वर सरकला

ठळक मुद्देनाशिकचे द्राक्षे संकटात'लानिना'चा हवामानावर प्रभाव

नाशिक : शहर व परिसरात शनिवारी (दि.९) संध्याकाळी साडेसहा वाजेपासून सुमारे तासभर धुव्वाधार अवकाळी पाऊस झाला. अचानकपणे आलेल्या या पावसाने शहरातील मध्यवर्ती भागातील सर्वच रस्त्यांवरुन पाण्याचे पाट वाहत होते. राजीव गांधी भवनासमोर शरणपुररोडवर पावसाचे पाणी तुंबल्याने या भागाला तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. सात वाजेनंतर उपनगरांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. साडेसहा वाजेपासून संध्याकाली पावणेआठ वाजेपर्यंत शहर व परिसरात १६.८ मिमी इतका पाऊस झाला.उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि पुर्वेचे वारे यांचा मिलाफ हा राज्याच्या किनारपट्टीवर झाल्यामुळे ढगनिर्मितीला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. किनारपट्टीवर उंच ढग दाटले असून या भागात वीजांचा गडगडाटासह वादळी स्वरुपाचा पाऊस होत आहे. तसेच अन्य भागांमध्ये काही वेळ अचानकपणे दमदार पाऊस होऊ लागला आहे. हवामान बदलामुळे यंदा चक्क जानेवारीत पावसाचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.शनिवारी दिवसभर नागरिकांना उष्माही जाणवला. कारण कमाल तापमानाचा पारा २९.३ अंशापर्यंत वर सरकला तर किमान तापमान सकाळी २० अंशापर्यंत पोहचल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली. तसेच वातावरणात सकाळी आर्द्रतेचे प्रमाण ९३ टक्के इतके होते. पंचवटी, मेरी, म्हसरुळ या भागासह शहराच्या मध्यवर्ती परिसरात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. 

'लानिना'चा हवामानावर प्रभावसध्या हवामानाची स्थिती 'लानिना' स्वरुपाची बनली आहे. यामुळे मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान तज्ज्ञ सुनील काळभोर यांनी सांगितले. प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाण्याचे तापमानात घट होऊन अशी स्थिती तयार होते, असे त्यांनी सांगितले. सध्या हवामानावर ह्यलानिनाह्णचा होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज कायम आहे. दुपारनंतर शहरात अशाप्रकारे अचानकपणे दमदार सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काळभोर म्हणाले.नाशिकचे द्राक्षे संकटातमध्य, उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा सामना पुढील तीन दिवस करावा लागू शकतो. या बेमोसमी पावसाचा मोठा फटका द्राक्षबागांना बसत आहे. द्राक्षांच्या घडांमधील मणी फुटत असल्याने द्राक्षबागायतदार धास्तावला आहे. एकुण नोव्हेंबरअखेरपासून हवामानाच्या बिघडलेल्या संतुलनामुळे यंदा नाशिकचे द्राक्षे मोठ्या संकटात सापडले आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा, गहूसारख्या पीकांच्या वाढीवरही दुष्परिणाम जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.-- 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसgodavariगोदावरी