शहरं
Join us  
Trending Stories
1
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
2
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
3
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
4
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
5
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
6
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
7
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
8
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
9
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
10
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
11
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
12
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
13
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
14
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
15
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
16
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
17
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
18
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
19
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
20
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कर्जमाफी संदर्भातील प्रश्न व पेट्रोलियम कंपनीकडून शेतकऱ्यांना धमकी या विषयांसदर्भात जिल्हा परिषदेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कर्जमाफी संदर्भातील प्रश्न व पेट्रोलियम कंपनीकडून शेतकऱ्यांना धमकी या विषयांसदर्भात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. दरम्यान, याच वेळी आदिवासी साखर कारखान्याकडे शेतकºयांचे थकीत असलेली रक्कम आठ दिवसात न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या संदर्भात भरत गावीत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या बँकांकडून पीक कर्ज वाटप सुरू आहे तर दुसरीकडे महात्मा ज्योतीबा फुले कर्जमाफी योजनेतील शेतकºयांनाही कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. परंतु या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने शेतकºयांना कर्जापासून वंचित ठेवले जात आहे. शेतकरी पात्र असताना त्यांना कर्ज देण्याबाबत बँका फिरवा फिरव करीत आहेत. केवळ ऊस लागवड करणाºया शेतकºयांना मोठे कर्ज दिले जाते. तर इतर पीक लागवड करणाºया शेतकºयांना त्याच्याकडे क्षेत्र जास्त असले तरी केवळ १० ते १५ हजार रूपयांपर्यंतच कर्ज मंजूर केले जात आहे. त्यामुळे शेतकºयांना खरीपाच्या तयारीसाठी बाहेरील सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. त्यातून शेतकरी पुन्हा कर्जबारी होण्याची शक्यता आहे. शिवाय कर्जासाठी शेतीचे कामे सोडून केवळ बँकांच्या दारातच चकरा मारण्यात शेतकºयांचा वेळ जात असल्याने शेती व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कर्जमाफी प्रक्रियेतील ज्या शेतकºयांना कर्ज माफ झाले आहेत त्या शेतकºयांची प्रक्रिया तत्काळ करून त्यांना नव्याने पीक कर्ज देण्याबाबत संबंधित विभागांना सूचना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकºयांना क्रेडिट कार्ड वाटप करण्याबाबत सर्व बँकांना सूचना कराव्यात हे कार्ड नसल्याने अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत. या सर्व प्रकरणांची चौकशी होवून कर्ज वाटप व इतर प्रक्रियेत दुजाभाव करणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
या शिवाय नवापूर तालुक्यातून जाणाºया इंडियन आॅईल कॉर्पोरेशनच्या पेट्रोलियम लाईनमुळे शेतकºयांवर अन्याय होत असून, कंपनीचे अधिकारी मनमानी पद्धतीने काम करून शेतकºयांना धमकावीत आहेत. यासंदर्भातही जोपर्यंत कंपनी आणि शेतकरी यांच्यात तोडगा निघून समन्वय होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

भरत गावीत यांनी नवापूर येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस देणाºया शेतकºयांची थकीत रक्कम मिळण्याच्या मागणीसंदर्भातही जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कारखान्याने १ डिसेंबर १९ ते १ मार्च २०२० या काळात गाळप केलेल्या उसापैकी सात हजार टन उसाचे पैसे शेतकºयांना दिलेले नाहीत. या बाबत शेकतºयांचे एक कोटी ७० लाख रूपयांचे रक्कम कारखान्याकडे घेणे आहे. ही रक्कम कारखान्याने न दिल्याने शेतकºयांची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे कारखान्याने थकीत रक्कम आठ दिवसात न दिल्यास नवापूर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.