शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST

बामखेडा व बिलाडी या दोन्ही गावांतील १९१ लोकांचे मंगळवारी प्रशासनाकडून स्वॅब घेण्यात आले होते. त्यात पुन्हा ...

बामखेडा व बिलाडी या दोन्ही गावांतील १९१ लोकांचे मंगळवारी प्रशासनाकडून स्वॅब घेण्यात आले होते. त्यात पुन्हा २१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या रिपोर्ट प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन व महसूल प्रशासनासह ग्रामपंचायत विविध उपाययोजना राबवत ग्रामस्थांची संसर्ग साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी जनजागृतीसह विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, गावातच मोबाईल व्हॅन पाठवून स्वप घेण्याचे काम करून तत्पर आरोग्य सेवा देत असले तरी ते बामखेडासह बिलाडी गावांना चिंतेची बाब असल्याचे चित्र दिसत आहे.

शहादा तालुक्यातील बामखेडा त.सा, येथील ४० लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यापैकी दोन महिला या अगोदरच मयत झाल्या आहेत. ग्रामीण भागात रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून, ग्रामस्थांमध्ये आरोग्य प्रशासनाकडून व महसूल विभागाकडून जनजागृतीसह विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी ग्रामस्थांनीही सहकार्य करणे गरजेचे असल्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा यांनी केले आहे. आरोग्य प्रशासनाकडून घरोघरी जाऊन सूचना देण्यात येत आहे. विनाकारण गर्दी करू नये, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच तोंडावर मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करण्यासह सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, डॉ. ज्योती सूर्यवंशी, आरोग्य सेविका डी.के. गिरासे, आशा सुपरवायझर सारिका बोरदे, आशा सेविका सुवर्णा इशी, मंडळाधिकारी जुबेर पठाण, तलाठी एम. बी. महाले, ग्रामसेवक हेमराज पाटील आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू करावी

ग्रामपंचायतीकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत असली तरी ग्रामपंचायतीने सहा दिवस स्वयंस्फूर्तीने गाव बंद केल्यास संसर्ग साखळी तोडण्यासाठी मदत होणार आहे. मात्र स्थानिक प्रशासनाने संसर्ग साखळी तोडण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच होम क्वॉरंटाइन न राहता विलगीकरण कक्षात दाखल होण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य पथक व ग्रामपंचायत प्रशासनासह महसूल प्रशासन पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरण कक्षात घेऊन जात आहेत. यावेळी प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनासह महसूल प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.