शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

नर्मदा विकासच्या ‘बेपर्वाई’चे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 3:15 PM

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी : जलप्रवासी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी नियम ठरवावे

नंदुरबार : मकरसंक्रांतीच्या शुभपर्वणीच्या नर्मदेच्या स्नानासाठी गेलेल्या नर्मदा काठावरील भाविकांवर मंगळवारी ‘संक्रांत’ आली. नर्मदेत बोट बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा अधिक जण बोटीत गुदमरल्याने अस्वस्थ अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. वास्तविक ही घटना म्हणजे नर्मदा विकास विभागाच्या बेपर्वाईच कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे.सरदार सरोवर प्रकल्पाची उंची 138 मीटर पूर्ण झाल्याने त्याच्या पाणलोटाने नर्मदेचे नदीतील रुपांतर सागरात झाले आहे. त्यामुळे अजूनही नर्मदा काठावर असलेल्या लोकांसाठी दळणवळणाचा प्रश्न अधिकच गंभीर आहे. मकरसंक्रांतीला नर्मदेत स्नान करण्याची परंपरा नर्मदा काठावरील आदिवासी आजही पाळत आले आहेत. त्यामुळे दरवर्षी नर्मदेच्या बुडित क्षेत्रात असलेल्या तेलखेडी, भुषा याठिकाणी शेकडो भाविक येतात. विशेषत: काठावर दुस:या नदीचे पाणी असल्याची भावना काही भाविकांमध्ये असते. त्यामुळे बहुतांश भाविक नर्मदेच्या दर्शनासाठी बोटीतून मध्य पात्रात जाऊन तेथे नारळ वाहणे व इतर पूजा करतात. असाच प्रकार मंगळवारी घडला. मकरसंक्रांतीची गर्दी असल्याने परिसरातील अनेक खाजगी बोटधारक व्यवसायासाठी येथे जमतात. प्रती सीट भाडय़ानुसार ते प्रवाशांना ने-आण करतात. मंगळवारी ज्या बोटीत दुर्घटना घडली ती बंदीस्त बोट होती. त्याची प्रवासी क्षमता जेमतेम 15 ते 20 जणांची आहे. मात्र बोटीत प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्यानुसार 60 पेक्षा अधिक जण होते. तर प्रशासकीय सूत्रानुसार 45 जण होते. या बोटीच्या टपावरदेखील अनेक प्रवासी होते. अर्थातच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने काठावरुन धक्का मारल्यानंतर बोट सुरू होताच काही अंतरावर गेल्यानंतर ती डगमगली. त्याचा तोल जाऊ लागल्याने टपावरील प्रवाशांनी उडय़ा घेतल्या. बोटही अर्धवट बुडाली. याठिकाणी काठावर अनेक लोक असल्याने त्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ज्या बोटीत प्रवासी भरले होते ती बोट पाण्यातून काढता येत नसल्याने गावातून ट्रॅक्टर आणले व ओढून बाहेर काढले. यादरम्यान बोटीमध्ये कोंडलेल्या प्रवाशांची अवस्था काय झाली असेल त्याची कल्पना न केलेली बरी. टपावरून ज्यांनी उडय़ा मारल्या त्यात लहान मुलांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे त्यांना पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाला.खरे तर भुषा येथे मकरसंक्रांतीला स्नानासाठी गर्दी होते ही परंपरा वर्षानुवर्षापासून सुरू आहे. त्यामुळे नर्मदा विकास विभागाने याठिकाणी यापूर्वीच दक्ष राहणे अपेक्षित होते. बोटीतून होणा:या प्रवासी वाहतुकीवर सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही नियम तयार करण्यात आले नाही. कुठल्या बोटीत किती प्रवासी वाहून न्यावे याबाबतचे निकषही ठरविण्यात आलेले नाही. किंबहुना त्या भागातील बोटधारक व्यावसायिकांनाही त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वच नियमांचा भंग करीत येथे बोटीने जलवाहतूक सुरू असते. प्रशासनाने यापूर्वीच याबाबत कार्यवाही केली असती तर ही घटना टाळता आली असती किंवा त्याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस असते तर त्यांनीही त्याबाबत काळजी घेतली असती. परंतु नर्मदाकाठ सर्वच रामभरोशावर सुरू असल्याने या भागातील आदिवासींची सुरक्षा वा:यावरच असल्याचे चित्र आहे.