शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

नर्मदा विकासच्या ‘बेपर्वाई’चे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 15:15 IST

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी : जलप्रवासी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी नियम ठरवावे

नंदुरबार : मकरसंक्रांतीच्या शुभपर्वणीच्या नर्मदेच्या स्नानासाठी गेलेल्या नर्मदा काठावरील भाविकांवर मंगळवारी ‘संक्रांत’ आली. नर्मदेत बोट बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू झाला तर 40 पेक्षा अधिक जण बोटीत गुदमरल्याने अस्वस्थ अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. वास्तविक ही घटना म्हणजे नर्मदा विकास विभागाच्या बेपर्वाईच कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे.सरदार सरोवर प्रकल्पाची उंची 138 मीटर पूर्ण झाल्याने त्याच्या पाणलोटाने नर्मदेचे नदीतील रुपांतर सागरात झाले आहे. त्यामुळे अजूनही नर्मदा काठावर असलेल्या लोकांसाठी दळणवळणाचा प्रश्न अधिकच गंभीर आहे. मकरसंक्रांतीला नर्मदेत स्नान करण्याची परंपरा नर्मदा काठावरील आदिवासी आजही पाळत आले आहेत. त्यामुळे दरवर्षी नर्मदेच्या बुडित क्षेत्रात असलेल्या तेलखेडी, भुषा याठिकाणी शेकडो भाविक येतात. विशेषत: काठावर दुस:या नदीचे पाणी असल्याची भावना काही भाविकांमध्ये असते. त्यामुळे बहुतांश भाविक नर्मदेच्या दर्शनासाठी बोटीतून मध्य पात्रात जाऊन तेथे नारळ वाहणे व इतर पूजा करतात. असाच प्रकार मंगळवारी घडला. मकरसंक्रांतीची गर्दी असल्याने परिसरातील अनेक खाजगी बोटधारक व्यवसायासाठी येथे जमतात. प्रती सीट भाडय़ानुसार ते प्रवाशांना ने-आण करतात. मंगळवारी ज्या बोटीत दुर्घटना घडली ती बंदीस्त बोट होती. त्याची प्रवासी क्षमता जेमतेम 15 ते 20 जणांची आहे. मात्र बोटीत प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्यानुसार 60 पेक्षा अधिक जण होते. तर प्रशासकीय सूत्रानुसार 45 जण होते. या बोटीच्या टपावरदेखील अनेक प्रवासी होते. अर्थातच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने काठावरुन धक्का मारल्यानंतर बोट सुरू होताच काही अंतरावर गेल्यानंतर ती डगमगली. त्याचा तोल जाऊ लागल्याने टपावरील प्रवाशांनी उडय़ा घेतल्या. बोटही अर्धवट बुडाली. याठिकाणी काठावर अनेक लोक असल्याने त्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ज्या बोटीत प्रवासी भरले होते ती बोट पाण्यातून काढता येत नसल्याने गावातून ट्रॅक्टर आणले व ओढून बाहेर काढले. यादरम्यान बोटीमध्ये कोंडलेल्या प्रवाशांची अवस्था काय झाली असेल त्याची कल्पना न केलेली बरी. टपावरून ज्यांनी उडय़ा मारल्या त्यात लहान मुलांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे त्यांना पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाला.खरे तर भुषा येथे मकरसंक्रांतीला स्नानासाठी गर्दी होते ही परंपरा वर्षानुवर्षापासून सुरू आहे. त्यामुळे नर्मदा विकास विभागाने याठिकाणी यापूर्वीच दक्ष राहणे अपेक्षित होते. बोटीतून होणा:या प्रवासी वाहतुकीवर सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही नियम तयार करण्यात आले नाही. कुठल्या बोटीत किती प्रवासी वाहून न्यावे याबाबतचे निकषही ठरविण्यात आलेले नाही. किंबहुना त्या भागातील बोटधारक व्यावसायिकांनाही त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वच नियमांचा भंग करीत येथे बोटीने जलवाहतूक सुरू असते. प्रशासनाने यापूर्वीच याबाबत कार्यवाही केली असती तर ही घटना टाळता आली असती किंवा त्याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस असते तर त्यांनीही त्याबाबत काळजी घेतली असती. परंतु नर्मदाकाठ सर्वच रामभरोशावर सुरू असल्याने या भागातील आदिवासींची सुरक्षा वा:यावरच असल्याचे चित्र आहे.