शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित व्यक्तीवर अलगीकरण कक्षातच उपचार करा - राधाकृष्ण गमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित नंदुरबार जिल्हा कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी ...

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित नंदुरबार जिल्हा कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

गमे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्याने गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली. या वेळी ग्रामीण भागात रुग्णांची संख्या अधिक येत असल्याने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित आढळलेल्या ३५५ गावांत प्रतिबंधित क्षेत्र बारकाईने राबविल्यास इतर गावांना संसर्गमुक्त ठेवता येईल. संसर्ग झालेला व्यक्ती शोधणे, त्याची चाचणी करणे आणि उपचार वेळेवर करण्याची गरज आहे. रुग्णालयात येण्यापूर्वी ऑक्सिजन पातळी खालावलेला रुग्ण आल्यास उपचार करण्यास मर्यादा येतात. जिल्ह्यात दुर्गम भाग असूनही चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत, पण गंभीर परिस्थितीत रुग्ण आल्याने उपचार योग्यरीतीने करणे शक्य होत नसल्याने वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे. ऑक्सिजन पातळी खालावल्यावर रुग्ण रुग्णालयात का पोहोचतात याचे विश्लेषण करावे व या शृंखलेतील त्रुटी दूर कराव्यात. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी २४ तासांत मृत्यू झालेल्यांची यादी रुग्णालयातून घ्यावी व सर्वेक्षण पथकाकडून या व्यक्तींची माहिती घ्यावी. रुग्णालयात उशिरा पोहोचण्याच्या कारणांचे विश्लेषण करण्यासोबत सर्वेक्षणातील अतिजोखमीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करावे. कोरोनाबाधित व्यक्तींना विलगीकरण कक्षात प्राधान्याने आणावे. गृह विलगीकरणात त्याच्या प्रकृतीकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे कुटुंबबाधित होत आहे आणि परिसरातील इतरांनाही संसर्ग होत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. रेमडेसिविर औषध वितरण शासनाच्या निर्देशानुसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णाच्या गरजेनुसार रुग्णालयाला औषधे देण्यात येत आहे. शासनातर्फेदेखील जिल्ह्याला विविध सुविधांसाठी सहकार्य करण्यात येत आहे. यासोबत संपर्क साखळी योग्यरीतीने शोधल्यास संसर्गावर नियंत्रण आणणे शक्य आहे. त्यासाठी कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावातील कर्मचाऱ्यांनी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर द्यावा. शाळा, आश्रमशाळा, सभागृह आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करावे. या ठिकाणी स्वच्छतेची व्यवस्था करावी. कुटुंबीयांचा बाधित व्यक्तीशी संपर्क येऊ देऊ नये. झोकून देऊन काम केल्यास बाधित व्यक्तीचे मृत्यू रोखण्यास यश येईल. कोरोनाला जिल्ह्यातून घालविण्यासाठी सर्वांनी योद्ध्याप्रमाणे काम करावे. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने आपली भूमिका योग्यप्रमाणे बजावल्यास संसर्गवाढीचा दर कमी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लसीकरणाचा वेग वाढवा

लसीकरणामुळे संसर्ग झाल्यानंतरचे गंभीर परिणाम टाळता येतात. लसीकरण झालेल्या व्यक्तीमध्ये परिणाम कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उर्वरित कोरोना योद्धे आणि ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. लसीकरणामुळे काहीच त्रास होत नाही हे नागरिकांना समजावून सांगावे. नागरिकांना लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी गावातील लहान डॉक्टर, स्थानिक लोकप्रतिनिधी, पाड्यातील प्रभावी व्यक्ती यांचे सहकार्य घेण्यात यावे. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या याद्या तयार करून लसीकरणासाठी पाठपुरावा करावा. सूक्ष्म दैनंदिन नियोजन तयार करून त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करून घ्यावे.