शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात वाहतुकीच बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

वाहतूक शाखेला केवळ डायव्हर्शनकडेच इंटरेस्ट. शहरातील वाहतुकीची कोंडी होऊ नये, ती सुरळीत रहावी याची जबाबदारीदेखील वाहतूक शाखेची असते. परंतु ...

वाहतूक शाखेला केवळ डायव्हर्शनकडेच इंटरेस्ट.

शहरातील वाहतुकीची कोंडी होऊ नये, ती सुरळीत रहावी याची जबाबदारीदेखील वाहतूक शाखेची असते. परंतु याचे भान पोलीस विसरले की, काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कारण केवळ मारोती मंदिर वगळता इतरत्र वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलीस दिसतच नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हातगाड्याधारक व वाहन चालक यांचे फावले आहे. अगदी कुठेही रस्त्याच्या कडेला वाहने लावतात आणि वाहतुकीची कोंडी करीत असतात. शुक्रवार हा बाजाराच्या दिवस असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे समजू शकतो. परंतु ही कोंडी आता कायमचीच झाली आहे. वास्तविक निदान बस स्थानक रोड, मेन रोड या दोन प्रमुख मार्गांवर तरी सुरळीत वाहतुकीसाठी एखादा कर्मचारी कायम स्वरुपी नेमणे आवश्यक आहे. तथापि पोलिसांना डायव्हर्शन रस्त्यातच अधिक इंटरेस्ट असल्याचा नागरिकांच्या आरोप आहे. अधिकाऱ्यांनी ही याबाबीकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून नाराजीच्या सूर व्यक्त केला जात आहे. शहरवासीयांना सतत डोकेदुखी ठरणारी वाहतुकीच्या कोंडीविषयी वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी आहे.

मोकाट गुरांच्या प्रश्न मार्गी लावावा.

मोकाट गुरांमुळे सर्वच जण प्रचंड वैतागले आहेत. मात्र पालिका आणि पोलीस या दोन्ही यंत्रणांनी त्याकडे साफ कानाडोळा केला आहे. तसेच पशुपालकांवर ठोस कार्यवाही केली जात नसल्यामुळे त्यांची मनमानी अधिकच वाढली आहे. शहरवासीयांनीदेखील सोशिक भूमिका घेतल्याने पालिकेने सुध्दा गिळमिळीत धोरण घेतले आहे. परिणामी मोकाट गुरेही शहरवासीयांच्या पिच्छा सोडत नसल्याचे विदारक चित्र आहे