शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत सूचना न पाळणाऱ्यांना वर्षभरात अडीच कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

कोरोनाकाळात पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. या काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत असताना ...

कोरोनाकाळात पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. या काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत असताना अनेक ठिकाणी पोलिसांमधल्या माणुसकीचेही दर्शन घडले. गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृद्ध आणि निराधारांना सहकार्य, नागरिकांना मार्गदर्शनातही पोलीस कर्मचारी व्यस्त दिसले. या कालावधीत तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि इतर काहींना कोरोनाशी झुंज द्यावी लागली. पण, पोलिसांनी आपले कर्तव्य कठोरपणे पार पाडले.

लॉकडाऊन असो वा जनता कर्फ्यू, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलीस कर्मचारी व्यस्त दिसले. नियम तोडणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबत अनावश्यक रस्त्यावर फिरणारे, मास्क न घालणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणारे, संचारबंदी मोडणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाईदेखील केली. जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यांतर्गत कोविड नियमांच्या उल्लंघनाबाबत सहा हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून सहा हजार ६१७ व्यक्तींकडून ३१ लाख २३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मास्क न लावणाऱ्या २६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना ६० लाख ५६ हजार रुपये दंड आकारण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या एक लाख २१ हजार ९५१ प्रकरणांत एक कोटी ५४ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून ३९ लाख ६१ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहे.

पोलीस हा नागरिकांचा मित्र आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्व मिळूनच कोरोनावर मात करता येईल. नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग वाढत असल्याने यापुढेदेखील नियमभंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पोलीसमित्र म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन पंडित यांनी केले आहे.