शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा, खापर व मांडवी क्वॉरंटाईन केंद्रात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी गेल्या पाच दिवसात मंदावली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील क्वॉरंटाईन केंद्रांमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी गेल्या पाच दिवसात मंदावली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील क्वॉरंटाईन केंद्रांमधील संख्याही कमी झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पावणेदोनशे एवढ्या जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारपर्यंत १५१ जण जिल्ह्यात क्वॉरंटाईन होते. यामुळे जिल्हा प्रशासनावरील ताणही कमी होत आहे. शहादा व नंदुरबारची केंद्रे मात्र फुल्ल आहेत.
जिल्ह्यात प्रत्येक तालुका मुख्यालयाला व इतर असे १२ क्वॉरंटाईन केंद्र करण्यात आले आहे. त्यात महिला व पुरुषांसाठी वेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या व मध्यंतरीच्या काळात क्वॉरंटाईन सेंटरमधील लोकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. गेल्या काही दिवसात मात्र तक्रारी कमालीच्या कमी झाल्या आहेत. सद्य स्थितीत नंदुरबार, शहादा येथील केंद्रात अधीक तर धडगाव व अक्कलकुवा केंद्रात एकही जण क्वॉरंटार्इं नसल्याची स्थिती आहे. तळोदा व नवापूर केंद्रातील संख्या मात्र वाढली आहे.
जिल्ह्यात नंदुरबारात सर्वाधिक पाच क्वॉरंटाईन केंद्र आहे. त्यात विमल हौसींग सोसायटीनजीक आदिवासी मुलांचे वसतिगृह व मुलींचे वसतिगृह, समाज कल्याण विभाग मुलींचे वसतिगृह, पॉलिटेक्नीक महाविद्यालयाचे वसतिगृह आणि हॉटेल गौरव पॅलेस यांचा समावेश आहे.
शहादा येथे आदिवासी मुलांचे वसतिगृह, मोहिदारोड, शहादा. नवापूर येथे आदिवासी सेवा सहायक शिक्षण प्रसारक संस्थेचे वसतिगृह व जयहिंद छात्रालय. तळोदा येथे आदिवासी मुलांचे वसतिगृह- आमलाड, अक्कलकुवा येथे जवाहर नवोदय विद्यालय इमारत, खापर येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह तर धडगाव येथे शासकीय आश्रम शाळा, मांडवी बुद्रूक यांचा समावेश आहे.
लक्षणे कमी असल्यास...
कोरोना संसर्गीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वॉरंटाईन करण्यात येते. अशा लोकांमध्ये कमी लक्षणे असल्यास किंवा त्यांना त्रास असल्यास त्यांचे स्वॅब घेतले जातात. ज्यांना काहीही त्रास नाही अशांची आरोग्य तपासणी केली जाते, आवश्यक वाटल्यास स्वॅब घेतला जातो. आठ ते १२ दिवस अशा लोकांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेऊन त्यांना घरी सोडण्यात येते. त्यामुळे आता क्वॉरंटाईन सेंटरमधील संख्या कमी होऊ लागली आहे. पूर्वी सलग १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे आवश्यक राहत होते.
तक्रारींची संख्या कमी
क्वॉरंटाईन सेंटरमधील तक्रारींचे प्रमाण आता बरेच कमी झाले आहे. पूर्वी आरोग्य तपासणी न होणे, स्वॅब घेतले न जाणे, कचरा आणि अस्वच्छता, पाण्याची समस्या असे प्रश्न राहत होते. त्याच प्रकारच्या सर्वाधिक तक्रारी देखील राहत होत्या.
ही बाब लक्षात घेता वरिष्ठ पातळीवरून स्थानिक प्रशासनांना कडक आदेश देण्यात आल्याने आता तक्रारींची संख्या अगदीच नगण्य झाली आहे. अर्थात ज्या ठिकाणी जास्त क्वॉरंटाईन आहेत अशा ठिकाणी काही कुरबूरी सुरूच असल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन दिवसात क्वॉरंटाईन सेंटरमधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये केवळ दोन जणांचा समावेश आहे.


नंदुरबारात आणखी दोन खाजगी लॉजेसला क्वॉरंटाईन केंद्राची मान्यता देण्यात आली आहे. यात आदर्श लॉज व श्रीजी रेसीडेन्सी यांचा समावेश करण्यात आला आहे.
शहाद्यात देखील खाजगी लॉज किंवा हॉटेलला क्वॉरंटाईन केंद्राची मान्यता देण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत.
शहाद्यातील कोविड कक्ष सुरू करण्यात आल्याने नंदुरबारातील दोन्ही कक्षावरील ताण बऱ्यापैकी कमी होणार असल्याचे चित्र आहे.