शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नंदूरबार आगाराकडून १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी सुरक्ष सप्ताह अभियान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST

सुरक्षा सप्ताहामध्ये सुरक्षित प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वाहकांकडून व बस स्थानकात वारवांर सूचना देण्यात येत आहे. प्रवाशांनी बसमध्ये दरवाजा जवळ ...

सुरक्षा सप्ताहामध्ये सुरक्षित प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वाहकांकडून व बस स्थानकात वारवांर सूचना देण्यात येत आहे. प्रवाशांनी बसमध्ये दरवाजा जवळ न थांबता सीटवर बसावे, खिडकीतून डोके बाहेर काढणे धोक्याचे आहे. अशा विविध सूचना वारंवार देण्यात येत आहे. कोरोनासदृश परिस्थिती असल्याने बसला निर्जंतुक करण्यात येत आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून प्रवास न करता बसने प्रवास करावा, असे आवाहन फलक बसेसमध्ये लावण्यात येत आहे.

प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्द्‌ल विश्वास वृध्दिंगत करण्याकरिता १८ जानेवारीपासून चालक व वाहकांचेे गट तयार करण्यात येऊन सुरक्षित वाहतुकीसाठी नियमावली आगारकडून देण्यात आली. सुरक्षा सप्ताहामध्ये चालकांच्या वाहन चालविण्याच्या सवयींवर विशेष लक्ष देण्यात आले़. तसेच आतिवेगाने बस चालविणे, चुकीच्या पध्दतीने पुढील वाहनास ओलांडून जाणे, अरुंद पुलावरुन समोरुन वाहन येत नसेल तरच राज्य परिवहन वाहन पुलावर नेणे, अनधिकृत थांब्यावर बस थांबविणे यापासून चालकांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

या कालावधीत वाहनांमधील दोष व वाहन चालविण्यामधील दोष या मुद्यांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. सर्व राज्य परिवहन कर्मचा-यांच्या मनामध्ये सुरक्षित वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सुरक्षित प्रवासासाठी वर्षभरात विना अपघात सेवा कालावधी पूर्ण करणाऱ्यांना पारितोषिक, सन्मानचिन्ह, बिल्ला व बक्षीस येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी देण्यात येणार आहे.

रस्त्यात बस नादुरुस्त होऊन अपघात होण्याआधी काळजी केली जाते. आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस मार्गावर धावण्याच्या निर्दोष स्थितीत असल्याबाबत आभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी खात्री केल्याशिवाय बसची फेरी करण्यात येऊ नये. चालकाने वाहनातील दोष निदर्शनास आणले असता, या दोषांचे पूर्णपणे निराकरण करण्यात आल्यानंतरच वाहन मार्गावर पाठविण्यात येते. सुरक्षितता मोहीम कालावधीत ज्या चालकांना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले, त्या चालकांना अपघाताचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात येऊन कोणत्या चुकीमुळे अपघात होतात, त्या चुका निदर्शनास आणून दिले जात आहे.

चालकांनी वाहन चालवतांना दक्षता घेणे महत्वाचे असून आपल्यावर ४० प्रवाशांना इच्छित स्थळी सुखरूप सोडण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे बसला अपघात न होण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे.

- मनोज पवार, आगार व्यवस्थापक नंदूरबार

बसमध्ये चढताना विद्यार्थ्याकडून चेंगराचेंगरी होत असते, सुरक्षा पोलीस बघ्याची भूमिका घेतात, महिलांना व विद्यार्थिनीना सुरक्षित बस प्रवास करण्यासाठी मानव विकास अंतर्गंत महिला बस सुरू करण्यात आली होती, ती बंद असून महिला बस पुन्हा सुरू करण्यात यावी

-ममता मिस्तरी, प्रवासी विद्यार्थिनी

चालकांकडून बऱ्याचवेळा बसस्थानकांतून बस काढताना घाई करण्यात येते त्यामुळे बसमध्ये चढताना अपघात होण्याची शक्यता असते, मुले खिडकीतून बसमध्ये प्रवेश करतात त्यावर सुरक्षा पोलिसांनी कारवाई करावी.

- दरबारसिंग गिरासे, प्रवासी