शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आरटीओ व बांधकाम विभागावर दोषारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : एक-दोन नव्हे तर तब्बल 13 प्रवाशांचा बळी घेणा:या रविवारच्या निमगूळजवळील भीषण बस अपघाताला राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : एक-दोन नव्हे तर तब्बल 13 प्रवाशांचा बळी घेणा:या रविवारच्या निमगूळजवळील भीषण बस अपघाताला राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभारच जबाबदार असल्याने या विभागाच्या विभाग प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल झाला पाहिजे, असा सूर जनमानसातून व्यक्त होत आहे.हृदय हेलावून टाकणारी आणि तितकाच संताप व्यक्त करणारा अपघात रविवारी निमगूळ, ता.शिंदखेडा गावाजवळ घडला. रात्रीच्या अंधारात औरंगाबाद-शहादा बस आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 13 प्रवाशांना जीव गमवावा लागला तर 24 प्रवासी जखमी झाले. छिन्न-विछिन्न           झालेले मृतदेह, वेदनेने विव्हळणारे प्रवासी, जीव वाचविण्यासाठी प्रवाशांचा आक्रोश हा अपघातानंतरचा प्रसंग हृदय हेलावणारा होता. सोमवारी शहरात एकापाठोपाठ एक निघालेल्या प्रेतयात्रा केवळ मृतांच्या नातेवाईकांनाच नव्हे तर समस्त शहादेकरांच्या हृदयाचा ठोका चुकविणा:या होत्या. अशा या दु:खद प्रसंगातही अपघातास कारणीभूत ठरणा:या राज्य परिवहन महामंडळ, रस्त्यांची दुर्दशा झालेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अवजड वाहनांमुळे वारंवार अपघात होऊनही डोळ्यावर पट्टी बांधणा:या आर.टी.ओ. विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत होता.शहादा आगाराचा नाशिक विभागात सर्वाधिक उत्पन्न देणा:या आगारांमध्ये समावेश असूनही धुळे येथून शहाद्याला येण्यासाठी रात्री साडेआठ वाजता औरंगाबाद-शहादा ही शेवटची बस आहे. नाशिक, जळगावला गेलेले शहादेकर परतीच्या प्रवासासाठी धुळ्याहून औरंगाबाद बस सापडावी म्हणून कसरत करीत धुळ्यार्पयत येतात. रात्री साडेआठ वाजेनंतर शहाद्यासाठी अजून एक बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांची असूनही परिवहन महामंडळातर्फे  दुर्लक्ष करण्यात येत आहे. कार्यालयीन व खाजगी कामासाठी नाशिकला जाणा:या प्रवाशांची संख्याही मोठी असून दिवसभरातील कामे आटोपून सायंकाळी शहाद्यासाठी बसच नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. यासाठी सायंकाळी नाशिक-शहादा बस सुरू करावी या प्रवाशांच्या मागणीलाही परिवहन महामंडळाने केराची टोपली दाखविली आहे. ही बस सुरू झाल्याने धुळ्याहून       परतीच्या प्रवाशांना औरंगाबाद   बसला ही बस पर्याय ठरू शकते.         परंतु एस.टी.च्या अधिका:यांच्या मनमानी कारभाराने प्रवासी कंटाळले आहेत.जिल्ह्यातील आर.टी.ओ. विभाग तर केवळ लुटायलाच असल्याची प्रतिक्रिया जनतेत आहे. रस्त्यांची दुर्दशा झालेली असताना 10 चाकी, 12 चाकी मोठमोठे ट्रॉल्या, कंटेनर चालतातच कसे असा गंभीर प्रश्न आहे. जड वाहने फक्त दिवसाच चालविण्याचा नियम असताना रात्री या वाहनांना परवानगी कशी मिळते? क्षमतेपेक्षा जास्त भारमान असलेली वाहने भरधाव वेगाने चालत असूनही आर.टी.ओ. विभागाला हे कसे दिसत नाही? खाजगी अवैध वाहतूक करणा:या वाहनांच्या टपावर जीव मुठीत धरुन प्रवास करणारे प्रवासी आरटीओंना दिसत नाहीत हादेखील एक चमत्कारच म्हणावा लागेल. आरटीओंच्या दुर्लक्षामुळेही मोठय़ा प्रमाणात अपघात घडत असल्याने हा विभागही रविवारच्या घटनेस जबाबदार आहे. मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमेवर नंदुरबार जिल्हा असल्याने जिल्ह्यात वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. वाहनांचे प्रकार आणि संख्या बघता रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. अंकलेश्वर-ब:हाणपूर हा महामार्ग असूनही हा रस्ता सिंगल आहे. सोनगीर ते शहादा हा मार्ग सिंगल आहे. वाहनांची वर्दळ बघता हे दोन्ही मार्ग दुहेरी असण्याची गरज आहे. परंतु सिंगल मार्ग असूनही रस्त्यातील खड्डय़ांमुळे या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्डेयुक्त सिंगल रोडदेखील अपघातांना कारणीभूत आहेत. या रस्त्यांवर वारंवार अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाची झोप उघडत नाही.शिरपूर, सोनगीर, तळोदा या मार्गावर वारंवार अपघात घडूनही आर.टी.ओ. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रीस्त असल्याने रविवारची दुर्घटना घडून 13 जणांना जीव गमवावा लागला हे दुर्दैवी आहे.