शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सुसरी धरण लगत रस्त्याचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST

ब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून दराफाटा ते सुसरी धरण लगत असलेल्या आंतरराज्य मार्गाचे काम अगदी कासवगतीने चालू आहे. या ...

ब्राह्मणपुरी : गेल्या दोन वर्षांपासून दराफाटा ते सुसरी धरण लगत असलेल्या आंतरराज्य मार्गाचे काम अगदी कासवगतीने चालू आहे. या महामार्गावर जागोजागी अर्धवट स्वरूपात काम करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना या कामाचा प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या अर्धवट कामामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जण अपंग झाले आहेत. या वेळी कंत्राटदाराचा एवढा हलगर्जीपणा आहे की, या महामार्गावर काम करत असताना कुठल्याही प्रकारचे बोर्ड, सूचना फलक न लावल्यामुळे वाहनधारकांना खूप अडचणीचे झाले आहे.

रात्रीच्या वेळेस या महामार्गावर वाहन चालवताना खूप त्रास होत आहे. वाहनचालक जीवमुठीत घेऊन या रस्त्यावर वाहने चालवत आहेत. या रस्त्याने जायचे म्हणजे राम भरोसे म्हणावे लागेल.

खेतियाकडून जाणाऱ्या चांदसैली गावापुढे दोन वर्षांपासून उकरून ठेवलेले रस्ते अद्यापही अर्धवटच आहेत. ही अपूर्ण कामे स्थानिक लोकांना खूप धोक्याची व त्रासदायक ठरत आहेत. अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कसल्याही प्रकारचे गांभीर्य घेतले जात नाही. तसेच हे काम पूर्ण करण्यास तयार होत नाहीत. पावसाळा चालू होऊन एक महिना झाला आहे. पाऊस पडल्यानंतर दरा फाट्यानजीक अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे गाडी स्लीप होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासाला कंटाळून लोक जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहेत. हा रस्ता म्हणजे जणूकाही मृत्यूचा सापळाच ठरू पहात आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.

रस्त्यावर पडले फूटभर खड्डे

खेतियाकडून शहादाकडे जाणाऱ्या मार्गावरील चांदसैली गावापुढे सुसरी धरण लागतच्या रस्त्यावर सुमारे एक ते दीड फुटाचे मोठं मोठे खड्डे पडले आहे. यामुळे खेतियाकडून शहादाकडे जाणाऱ्या जीप चालकाला खड्ड्यांचा अंदाज न आल्याने सुमारे ५० ते ६० फूट लांब जीप फेकली गेली. त्यात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी जीपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. असे लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले असून, कासव गतीने सुरू असलेल्या कामाला गती देण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. हा रस्ता तयार होत नसेल तर खड्डे तरी बुजवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

स्त्यालगत लावलेली झाडे किती जगवली?

या महामार्गाचे काम करत असताना रस्त्यालगत असलेली हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच संबंधित विभागाकडून या रस्त्याच्या कडेने झाडे लावण्यात आली. पण ती किती जगवली हा प्रश्न आहे.

एकही झाड जगले नाही

पाणी नाही दिले, म्हणून झाडे जळून गेली. या कामामध्ये प्रशासनाने लक्ष घालून लावलेल्या झाडांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.