शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रावलापाणी विकासाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आदिवासींच्या स्वातंत्र्य लढ्याची ओळख असलेल्या रावलापाणीच्या पर्यटनस्थळाचे काम संबंधित यंत्रणेने हाती घेतले असले तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : आदिवासींच्या स्वातंत्र्य लढ्याची ओळख असलेल्या रावलापाणीच्या पर्यटनस्थळाचे काम संबंधित यंत्रणेने हाती घेतले असले तरी हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. आता वाढीव निधीदेखील उपलब्ध झाल्यामुळे या कामास गती देण्याची मागणी पर्यटनप्रेमींकडून होत आहे.भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश साम्राज्या विरोधात २ मार्च १९४३ रोजी तळोद्यापासून नजीक असलेल्या रावलापाणी येथे आदिवासींनी तीव्र लढा दिला होता. त्यामुळे ब्रिटीशांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात अनेक शहिदांना आपले हौतात्म्य पत्कारावे लागले होते. या घटनेमुळे साहजिकच रावलापाणीच्या आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामाची ओळख बनली होती. आदिवासी शहिदांचा हा इतिहास भावी पिढीस प्रेरणादायी व्हावा म्हणून गेल्या पाच ते सहा वर्षापासून जिल्ह्यातील आदिवासी दरवर्षी २ मार्च रोजी शहिदांच्या स्मृतींना जागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावतात.या सर्व पार्श्वभूमीवर तेथे पर्यटनस्थळ विकसीत व्हावे यासाठी डॉ.कांतीलाल टाटीया, पं.स.चे माजी सभापती जितेंद्र पाडवी, माजी सरपंच प्रवीण वळवी आदींनी शासनाकडे मागणी केली होती. त्यासाठी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, खासदार डॉ.हीना गावीत यांनीही पाठपुरावा केला होता.तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या विभागाकडून साधारण पावणे तीन कोटींचा निधीदेखील मंजूर केला होता. त्याचबरोबर वनविभागानेही आपल्या अखत्यारीतील दोन एकर जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केली होती. या सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने यंदा दिवाळीनंतर प्रत्यक्ष पर्यटनस्थळाचे काम हाती घेतले आहे. सुरूवातीला रावलापाणी गावापासून प्रत्यक्ष स्मारकापर्यंतच्या ४०० ते ५०० मीटर लांबीचा रस्ता करण्यात आला आहे. त्यानंतर तेथील हॉलचे काम हाती घेण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे काम थांबविण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. असे असले तरी यात सर्वच तांत्रिक बाबी सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामालादेखील गती देण्याची मागणी इतिहास व पर्यटनप्रेमींकडून जोर धरू लागली आहे.