शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:58 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांचा समाना करीत असतांनाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदीमुळे उद्भवलेल्या समस्यांचा समाना करीत असतांनाच जिल्ह्यात अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये मोठी भर पडली आहे.कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात सुरु विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांचाच एक भाग असलेल्या संचारबंदीत सर्वच घटक अडले आहे, त्यातून शेतकरीही सुटला नाही. वाहतुक बंद झाल्याने शेतमाल पडून आहे. बहुतांश पिके शेतातच खराब होत आहे. अशा समस्यांशी शेतकरी या दोन हात करीत असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस देखील झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दुपटीने भर पडली आहे.नंदुरबार तालुक्यातील शहादा शहादे व कोपर्ली भागात गहू पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकºयांचे गव्हाचे पिक काढणीचा कालावधी आला आहे.त. परंतु सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे गहू कापणीसाठी कुठलाही हार्वेस्टर मालक पुढे धजावत नाही. परिणामी पिके शेतातच आहे. असे असतांनाच अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.पपई उत्पादकांची देखील हीच परिस्थिती आहे. संचारबंदीमुळे पपई खरेदीसाठी व्यापरी येत नाही. पपईची तोडणीच झाली नसल्यामुळे बहुतांश शेतकºयाची पपई परिपक्वहोऊन झाडावरच पिकली, काही पपई खराब देखील झल्या. अशी समस्या असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस झाला, या पावसाने अन्य पपईच्या बागाही व्यापल्या असून फळे खराब होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काही नियम शिथील करण्याची मागणी होत आहे.