शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
3
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
4
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
5
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
6
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
7
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
8
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
9
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
10
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
11
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
12
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
13
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
14
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
15
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
16
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
17
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
18
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
19
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
20
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उगवण क्षमतेबाबत दोनच तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत़ यातून बोगस ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत़ यातून बोगस बियाण्याचा प्रश्न समोर आला आहे़ परंतु नंदुरबार जिल्ह्यात याउलट स्थिती असून केवळ दोन शेतकऱ्यांनी बियाणे उगवणीबाबत तालुकास्तरावर तक्रार दिली होती़ या तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे़
शहादा तालुक्यातील एक आणि अक्कलकुवा तालुक्याच्या एका शेतकºयाने सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर रोपच उगवले नसल्याची तक्रार तालुका कृषी विभागस्तरावर केली होती़ या तक्रारीनुसार बियाणे कंपन्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी त्या परस्पर बदलून देत शेतकºयांचे समाधान करुन दिले आहे़ सोयाबीन बियाण्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागाला सक्तीचे आदेश देत बियाणे तपासणी करुन घेण्याचे सूचित केले आहे़ त्यानुसार गुणनियंत्रण अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय पथके बियाणे तपासणी करत आहेत़ दोन तक्रारी वगळता जिल्ह्यात एकही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे़ दरम्यान सोयाबीन बियाण्याची योग्य प्रकारे वाहतूक न करणे, साठा करुन ठेवताना अयोग्य जागा तसेच शेतकºयांकडून ओल नसलेल्या जमिनीत पेरणी यामुळे अडचणी येत असाव्यात असा अंदाज कृषी तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे़ जिल्ह्यात महाबीजसह पाच खाजगी कंपन्या सोयाबीन बियाण्याचा दरवर्षी पुरवठा करतात़


जिल्ह्यात यंदा २७ हजार २४१ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणीचा अंदाज आहे़ यातून आजअखेरीस १७ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरा पूर्ण झाला आहे़ जिल्ह्यात प्रतीहेक्टर ७५ किलो सोयाबीन बियाणे लागते़ यामुळे कृषी विभागाने १५ हजार ७५० क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवक करुन घेतली आहे़