शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वन नेशन वन रेशन कार्डचा जिल्ह्यात २८ हजार शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

नंदुरबार जिल्ह्यातील रास्तभाव दुकानात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीद्वारे २८ हजार २२९ शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल ...

नंदुरबार जिल्ह्यातील रास्तभाव दुकानात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीद्वारे २८ हजार २२९ शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केली आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची सुरूवात २०१८ मध्ये करण्यात आली. योजनेअंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणीकरण करून लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या चार राज्यात क्लस्टरच्या स्वरुपात प्रायोगिक तत्त्वावर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जानेवारी २०२० पासून १२ राज्यात तर डिसेंबर २०२० पासून ३२ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ही योजना सुरू करण्यात आली आहे. या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशातील राष्ट्र्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करून कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. राज्यातील रास्तभाव दुकानातून स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी इ. स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतराच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानात त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य प्राप्त करून घेण्याची सुविधा पोर्टेबिलीटीद्वारे ई-पॉस मशीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत शिधापत्रिकेवरील १२ अंकी क्रमांकाचा वापर करून आधार प्रमाणिकरणद्वारे धान्य वितरित करण्यात येते.

सर्वसाधारपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करून धान्याची उचल केली जाते. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ९४.५६ लाख शिधापित्रकाधारकांनी जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे. योजनेच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्र.१४४४५ कार्यान्वित करण्यात आला असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे.