शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण व दुर्गम भागासाठी ऑनलाइन शिक्षणाचे ना कुठले व्हिजन ना नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. असे असले तरी गेल्या वर्षाप्रमाणेच शाळा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. असे असले तरी गेल्या वर्षाप्रमाणेच शाळा बंद राहतील हे स्पष्टच आहे. असे असतानाही ऑनलाइन शिक्षणाचे ना कुठले व्हिजन ना नियोजन असल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीणसह आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात राहण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याची गुणवत्ता आणखी घसरून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

कोरोनामुळे गेली वर्षभर शाळा सुरूच झाल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षण देण्याचा दावा केला गेला, तरी तो पूर्णत: फोल ठरला. त्यामुळे शिक्षणाच्या टप्प्यातील त्या वर्षाचा शिक्षणक्रमातील अभ्यासाला विद्यार्थी मुकले. त्याचा परिणाम पुढील शिक्षणात त्यांना भोगावा लागणार आहे. खाजगी शाळा व काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील सुशिक्षित आणि बऱ्यापैकी सधन असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी थोडेफार अभ्यासक्रम समजू शकले; परंतु ग्रामीण आणि आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपासून ऑनलाइन शिक्षण फारच दूरच राहिल्याचे वेळोवेळी झालेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. असे असतानाही येत्या शैक्षणिक वर्षासाठी किमान जिल्ह्यासाठी तथा आदिवासी दुर्गम भागासाठी काही व्हिजन ठेवले नाही ना काही नियोजन केले गेले. जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभाग आणि या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनाही उदासीनच राहिल्या.

गेल्या वर्षाचीच ‘री’ ओढणार?

कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक राहणार असल्याचाही अंदाज बांधला जात आहे. अशा स्थितीत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होणे येत्या शैक्षणिक वर्षात तरी शक्य नाही. त्यातच १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले आहे. शाळा बंद असताना या शैक्षणिक वर्षात गेल्या वर्षाची ‘री’ ओढली जाईल हे स्पष्टच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान यंदाही निश्चित आहे.

पहिलीचे विद्यार्थी काय शिकले?

ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचा श्रीगणेशा गेल्या वर्षी केला त्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी काहीही न शिकता दुसरीच्या वर्गात गेले आहेत. हे विद्यार्थी जसे पुढील शैक्षणिक वर्षाचा टप्पा गाठतील तसा त्यांना त्यांच्या अभ्यासक्रम काठिण्य पातळीवर जात राहील. परिणामी, असे विद्यार्थी मूळ शिक्षणालाच मुकलेले असतील हे स्पष्ट आहे.

वर्षभर काहीही हालचाली नाहीत

गेल्या वर्षी ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग जिल्ह्यात तरी फेल गेल्याचे सर्वश्रुत आहे. असे असताना येत्या शैक्षणिक वर्षात देखील शाळा बंद राहतील ही शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने काही व्हिजन का ठेवले नाही. नियोजन का केले गेले नाही? हा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.