शहरं
Join us  
Trending Stories
1
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
4
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
5
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
6
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
8
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
10
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
11
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
12
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
13
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
14
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
15
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
16
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
17
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
18
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
19
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
20
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी साफसफाईची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील मोठ्या गटारी व नाल्यांमधील केरकचरा, प्लास्टीक व घाणीमुळे पावसाळ्यात पाण्याचा व्यवस्थित निचरा होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील मोठ्या गटारी व नाल्यांमधील केरकचरा, प्लास्टीक व घाणीमुळे पावसाळ्यात पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी मोठ्या गटारी व नाल्यांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्याची मागणी होत आहे.
शहरातील प्रमुख भागात असलेल्या मोठ्या गटारांमधील पाण्याचा पावसाळ्यात सुरळीतपणे निचरा होत नसल्याने रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच या पाण्यामुळे डबके साचून डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढतो व आरोग्याचाही प्रश्न उद्भवतो. डोंगरगाव रस्ता, पालिका प्राथमिक शाळा क्रमांक नऊ व १६, दोंडाईचा रस्ता, कलंदर शहा बाबा दर्गा, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार या भागात नेहमी पाणी शिरते व वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पालिकेने डोंगरगाव रस्त्यालगत पालिका प्राथमिक शाळेलगत, दोंडाईचा रस्ता, पुरुषोत्तम मार्केट व नवीन भाजीपाला मार्केटला लागून असलेल्या गटारींची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक आहे. या गटारी व नाल्यामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा व घाण साचली आहे. या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी सुरळीतपणे निघत नसल्याने रस्त्यावर पाणी साचते. मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरुन गरीब कुटुंबांचे नुकसान झाले होते.
शहरातील शिवसेना कार्यालय, न्यायालय ते हॉटेल पटेल रेसिडेन्सी चौकजवळ असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर घाण व गाळ साचल्याने या नाल्यांमधून नेहमी दुर्गंधी येते. यामुळे या मुख्य रस्त्यावर प्रवास करणाºया नागरिकांना नेहमी दुर्गंधीचा सामना करावा लागतो. काही लोकांनी घरातले घाण पाणी या नाल्यात सोडल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात पूर्वेकडील नाला व मोकळ्या जागेतील पाणी दोंडाईचा रस्त्यालगतच्या नवीन वसाहतींमधील काही नागरिकांच्या घरांमध्येदेखील शिरते. यामुळे या भागातील नाल्यांमधील घाण कचरा व मातीचे ढीग काढून त्यांचे खोलीकरण केल्यास पावसाळ्यात पाण्याची योग्य विल्हेवाट लागून नागरिकांचे होणारे हाल थांबणार असल्याने पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.