शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

नंदुरबार जिल्हा पुन्हा शतप्रतिशत काँग्रेसमय करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:41 PM

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा उभारी घेत आहे. लवकरच होणा:या लोकसभा, विधान-सभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नियोजन आणि तयारी सुरू करण्यात आली आहे. मे महिन्यापासून सर्व तालुकास्तरावर बैठकांना सुरुवात होईल. पूर्वीप्रमाणेच नंदुरबार शतप्रतिशत काँग्रेसमय राहील असा विश्वास जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ह्यलोकमतह्णसंवाद उपक्रमात व्यक्त केला.यावेळी बोलतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, भाजपची नुसतीच हवा आहे. गेल्या निवडणुकांमध्ये लाटेवर स्वार होऊन काही जणांना यश मिळाले. परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. काँग्रेसनेही काही प्रमाणात आलेली मरगळ झटकलेली आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये दिसून आला. चार पालिकांपैकी दोन काँग्रेसच्या ताब्यात आहेत तर एका पालिकेत बहुमत काँग्रेसचे आहे. तळोदा पालिका देखील हातची गेली. काही चुका तेथे झाल्या हे मात्र मान्य करावे लागेल. लगतच्या मध्यप्रदेशातील खेतिया नगरपंचायतीत देखील काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला. जिल्ह्यात त्याआधी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पक्षाने चांगली कामगिरी केली आहे.येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका या सोबतच होतील अशी शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाभरात पक्षातर्फे बैठकांचे सत्र सुरू करण्यात येणार आहे. नुकतीच ज्येष्ठ नेते आमदार सुरुपसिंग नाईक यांच्या निवासस्थानी बैठक झाली. येत्या मे महिन्यापासून अर्थात लगअसराई आटोपल्यानंतर सर्व तालुकांमध्ये बैठका घेतल्या जातील. त्या बैठकांना जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. त्यानंतर विभाग आणि ब्लॉक निहाय बैठका होतील. पक्षातील कार्यकत्र्याची निवडणुकांच्या दृष्टीने पुर्णपणे तयारी करवून घेतली जाईल. यावेळी लोकसभेची एक जागा आणि चारही विधानसभेच्या जागा काँग्रेस राखेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.भालेर एमआयडीसीबाबत त्यांनी सांगितले, ही एमआयडीसी काँग्रेसच्या कार्यकाळात मंजुर झाली आहे. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे जावून आपण स्वत: फाईलवर सही करवून घेतली. त्यावेळी विरोधकांनी पुरेपूर विरोध केला. पुर्णपणे शासकीय जागेवर ही एमआयडीसी उभी राहणार असल्यामुळे शेतक:यांचेही नुकसान नाही हे पटवून देण्यात आले. आता लवकरच येथे उद्योगांना प्लॉट उपलब्ध होऊन उद्योग सुरू होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.नंदुरबार पालिकेत देखील विकासात कुठलेही राजकारण केले जाणार नाही. विरोधकांनी विकास कामांचे प्रस्ताव दिल्यास शहर आणि नागरिकांच्या दृष्टीने हिताचा असेल तर नक्कीच तो स्विकारला जाईल. परंतु विरोधकांनीही केवळ विरोधाला विरोध न करता विकास कामांना साथ दिली पाहिजे अशी अपेक्षाही आमदार रघुवंशी यांनी व्यक्त केली.