शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

पायवाटाच मांडतात जनजीवनाच्या व्यथा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम तथा नर्मदा काठावरील अनेक गावांना विकासाची प्रतिक्षा आहे. बहुतांश गावांमध्ये अंशत: विकास कामे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम तथा नर्मदा काठावरील अनेक गावांना विकासाची प्रतिक्षा आहे. बहुतांश गावांमध्ये अंशत: विकास कामे झाले असले तरी तो तेवढ्यापुरता दरवळणारा गंध ठरतो. गंध जसा क्षणिक, तसा हा विकासही तेथील नागरिकांसाठी क्षणिक ठरत आहे. नर्मदा नदी काठावील पौला व अन्य गावांपर्यंत रस्ते पोहोचले असले तरी अल्पावधीतच हे रस्ते खराब झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या नशिबी पायपीटच आली आहे.धडगाव तालुक्यातील कात्री ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत पौला व अन्य गावांमध्ये काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे झाले. परंतु मागील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे. कोट्यवधीचा निधी खचू करुन सन २००८-०९ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता झाला. परंतु कात्री ते पौला दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील अनेक ठिकाणी पूल तुटून भगदाड पडले. तर ठिकठिकाणी भरावही खचल्याने परिसरातील सात गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे येथील रहिवाशांना पायवाटेचा आधार घेऊन तब्बल २५ किलो मिटरचा फेरा मारून कात्री किंवा खुंटामोडी ही गाठावी लागत आहे. धडगांव अथवा मोलगी येथे जाण्यासाठी वाहन मिळत असते. तेथील नागरिकांना अशा अडचणींचा सामना करावा लागत असून सविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.