शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

खरीप नियोजन आढाव्याला होणार यंदा कोरोनामुळे विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

दरवर्षी खरीप हंगाम नियोजनासाठी कृषी विभागाची एप्रिल महिन्यापासूनच तयारी सुरू होत असते. बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी नोंदविणे, त्याच्या ...

दरवर्षी खरीप हंगाम नियोजनासाठी कृषी विभागाची एप्रिल महिन्यापासूनच तयारी सुरू होत असते. बियाणे, खते, किटकनाशके यांची मागणी नोंदविणे, त्याच्या उपलब्धतेबाबत आढावा घेणे, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कुठल्या पिकाचे क्षेत्र वाढू शकते किंवा घट होऊ शकते, याचा तज्ज्ञांमार्फत आढावा घेतला जातो, शिवाय बोगस बियाणे, खते यांच्यावर नियंत्रणासाठी पथके स्थापन करण्याचे नियोजन असते. जिल्ह्यात खरिपाचे लागवड क्षेत्र जवळपास अडीच लाख हेक्टर इतके आहे. त्यात सर्वाधिक अर्थात एक लाखापेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. त्या खालोखाल सोयाबीन, मका व इतर पिकांचा समावेश असतो. त्यामुळे कापूस बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची मे महिन्यातच धावपळ सुरू होते. कारण बहुतेक बागायतदार शेतकरी मे महिन्यातच कापूस लागवड करीत असतात. गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाल्याने, अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिकांनाही अद्यापही चांगले पाणी आहे. त्यामुळे बहुतेक शेतकरी यंदा मे महिन्यातच कापूस लागवडीवर भर देणार असल्याचे चित्र आहे. त्या दृष्टीने अशा शेतकऱ्यांना वेळेवर कापूस बियाणे उपलब्ध करून देणे कृषी विभागाचे प्रथम कर्तव्य ठरणार आहे. असे असले, तरी यंदा गेल्या वर्षाप्रमाणेच कोरोनाची स्थिती भयावह रूप धारून करून बसली आहे. त्यामुळे कृषी विभागाचे खरिपाचे नियोजन करतांना मोठी कसरत ठरणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर साधारणत: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हास्तरीय खरीप नियोजन आढावा बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होण्याची शक्यता आहे. कारण मेच्या दुसऱ्या आठवड्यात विभागीय आणि तिसऱ्या आठवड्यात राज्याची बैठक घ्यावी लागत असते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.