शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

तापीवरील उपसा सिंचन योजना दुरुस्तीसाठी २२ जणांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

नंदुरबार : तापीवरील २२ उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग द्यावा व पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्या या मागणीसाठी संघर्ष ...

नंदुरबार : तापीवरील २२ उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग द्यावा व पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्या या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी १२ जण प्रकाशा बॅरेजजवळ जलसमाधी घेणार आहेत. शासन, प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन, मागणी करून, आंदोलन करूनही याबाबत दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केले जात असल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तापीवरील २२ उपसा जलसिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रश्न रेंगाळला आहे. दोन्ही बॅरेजमध्ये पाणी असूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. परंतु निधीचा प्रश्न आणि इतर कारणांमुळे अद्यापही दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. याबाबत संघर्ष समितीने प्रशासनाला याबाबत ३१ जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला होता. परंतु तरीही कार्यवाही न झाल्याने १ फेब्रुवारी रोजी जलसमाधी घेण्याचा निर्णय १२ जणांनी घेतला आहे.

जलसमाधी घेणाऱ्यांमध्ये समितीचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील (लोणखेडा) यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष जिजाबराव गोरख पाटील (धमाणे), विजय महेंद्रलाल गुजराथी (कोपर्ली), यशवंत लिमजी पाटील(कहाटूळ), राजाराम दगडू पाटील (कहाटूळ), रवींद्र उत्तम पाटील (कहाटूळ), संजय लक्ष्मण पाटील (शिरुड), रितेश खेमराज बोरसे (कळंबू), विनोद चिंतामण पाटील (पुसनद), राजाराम सखाराम चौधरी(लहान शहादे), यशवंत जगन्नाथ पाटील (लहान शहादे), रवींद्र शंकर पाटील(शिंदे) व राजेंद्र विलास पाटील (खोडसगाव) यांचा त्यात समावेश आहे.

या आंदोलनाला उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेनेही पाठिंबा दिला आहे. लहान शहादे येथे मुकेश राजाराम चौधरी, रवींद्र शंकर पाटील, वसंत तुंबा पाटील, काशीनाथ नारायण पाटील, उद्धव दशरथ चौधरी, दगडू पाटील आणि संदीप मगन चौधरी यांचेकडे लहान शहादे येथे निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे कार्यवाह एन.एम. भामरे डॉ.एच.एम. पाटील उपस्थित होते.

पोलीस बंदोबस्तात वाढ

प्रकाशा बॅरेज स्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली दहा अधिकारी व दीडशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनचे ४० कर्मचारी, पट्टीचे पोहणारे स्थानिक २० जण यांचा त्यात समावेश आहे.