शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजार नागरिकांचे ‘इनकमिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रजाळे येथील कुटूंबांच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ अहवालानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रजाळे येथील कुटूंबांच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ अहवालानंतर तालुका आरोग्य विभाग कामाला लागला असून तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या २१ हजार नागरिकांचा आढावा घेतला जात आहे़ यामुळे कोरोना सदृश लक्षणे असलेल्या नागरिकाची माहिती मिळून क्वारंटाईन करणे सोपे होणार आहे़
लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर परराज्यात तसेच राज्याच्या मोठ्या शहरांमध्ये अडकून पडलेले मूळ रहिवासी, नोकरदार आणि स्थलांतरीत झालेले मजूर हे परत येत आहेत़ परतणाऱ्या या सर्वांची रस्त्यांवर किंवा त्यांच्या घरी जावून स्क्रिनिंग केली जात आहे़ याचरदम्यान रजाळे येथील कुटूंब धुळे मार्गाने नंदुरबार येथे आले होते़ यानंतर यातील एकास कोरोनाची बाधा झाल्याचा प्रकार समोर आला़ या प्रकारानंतर तालुका आरोग्य विभाग पुन्हा सर्तक झाला असून तालुक्याच्या विविध भागात आलेल्या नागरिकांचा आढावा घेत त्यांच्यातील लक्षणांची माहिती आशा आणि आरोग्य सेविकांकडून मागवली जात आहे़
तालुका आरोग्य विभागाच्या या कामामुळे नंदुरबार तालुका नजीकच्या काळात कोरोनामुक्त होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
तूर्तास जिल्ह्यातील सर्वाधिक तीन मोठे क्वारंटाईन सेंटर हे नंदुरबार तालुक्यात असून त्याठिकाणी सध्या ४१ जण दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे़ या कक्षांमध्ये दाखल केलेल्यांना सर्व प्रकारच्या सोयी देतानाच त्यांचे समुपदेशन करुन कोरोनाची भिती घालवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ तालुका आरोग्य विभागासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात हे गावोगावी नागरिकांसोबत संपर्कात असून बाहेरगावाहून आलेल्यांची तात्काळ चौकशी होत आहे़

नंदुरबार तालुक्यात आतापर्यंत २१ हजार ३७५ नागरिक बाहेरगावाहून आले आहेत़ पुण्या-मुंबईसह राज्यातील इतर शहरे आणि गुजरात राज्यातून ते परत आले आहेत़ मार्चपासून येथे आलेल्या या सर्व नागरिकांचे स्क्रिनिंग यापूर्वीच झाले आहेत़ वेळोवेळी आकड्यात वाढ होत असून प्रत्येकाची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे पथक घरी जावून प्रवासाची माहिती घेत आहे़
नंदुरबार शहरालगत होळ तर्फे हवेली शिवारातील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेत ५०, याच भागातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ३० तर शहरातील पटेलवाडी भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात तब्बल १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ एकूण १८० बेडची व्यवस्था असल्याने याठिकाणी ३१ वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या कक्षांमधून आतापर्यंत २१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या तिन्ही कक्षांमध्ये ४१ जण दाखल आहेत़
बाहेरगावाहून मोठ्या संख्येने येणाºया नागरिकांना क्वारंटाईन कक्षात ठेवणे शक्य नसल्याने त्यांच्या हातावर शिक्के मारुन घरीच क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे़