शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर केळी कटाई सुरू; भाव मात्र मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 21:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीमुळे धास्तावलेल्या मजूर वर्गाची प्रशासन आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या केळीची कटाई सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोना महामारीमुळे धास्तावलेल्या मजूर वर्गाची प्रशासन आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या केळीची कटाई सुरू झाली आहे. तथापि व्यापाऱ्यांकडून अतिशय स्वस्तात खरेदी केली जात असल्यामुळे उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याची शेतकºयांची व्यथा आहे. व्यापाºयांच्या अडवणुकीच्या धोरणाबाबत जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.कोरोना या महामारीचे देशावरील संकट अधिकच गडद होत आहे. आता जिल्ह्यातही त्याने आपले डोकेवर काढले आहे. त्यामुळे शेतमजुरांमध्येदेखील त्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. या मजुरवर्गाने शेतीच्या कामावर जाणे ही बंद केले होते. मजुरांचा फटका केळी उत्पादक शेतकºयांना बसला होता. कारण परराज्यातून येणाºया केळीच्या वाहनचालकाच्या संसर्गामुळे मजूर वर्ग केळीची कापणी करण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळे परिपक्व झालेल्या केळीच्या बागाचे नुकसान होत असे. परिणामी त्रस्त शेतकºयांनी महसूल प्रशासनास निवेदन दिले होते. त्यात धास्तावलेल्या मजुरांची भिती काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार तहसीलदार पंकज लोखंडे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, फौजदार ज्ञानेश्वर पाकळे यांनी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांची बोरद येथे बैठक घेतली होती. त्यांनी मजुरांची भिती काढून वाहनचालकांची आरोग्य तपासणी केली जात असते. त्यामुळे संसर्गाची शक्यता नसते. त्याच बरोबर मजुरांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची सूचना व्यापाºयांना केली आहे. त्यानंतर बोरद, मोड, तळवे, मोरवड, मोहिदा, धानोरा, खेडले परिसरातील शेतकºयांची केळीची कटाई सुरळीत झाली असली तरी केळीच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे.पिलबाग तर सोडा नक्तीलाच २५० ते ३०० रूपये दराने मागणी केली जात आहे. व्यापारी संगनमत करून अडवणुकीचे धोरण घेत असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. कोरोनामुळे वाहतुकीची कटकट, मालाची मागणी अशा सबब सांगून शेतकºयांची प्रचंड आर्थिकलूट करीत असल्याचेही शेतकरी सांगतात. वास्तविक केळीचे रोप लावणीपासून तर परिपक्वहोण्यापर्यंत लाखो रूपये खर्चकरावा लागला आहे. शिवाय वाढत्या तापमानामुळे केळीचे घडच झाडावरून सटकत आहे.साहजिकच शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यात आता सातत्याने घसरणाºया दराने भर घातली आहे. शेजारच्या जळगाव जिल्ह्यात ७०० रूपये दर आहे. एवढेच नव्हे शहादा तालुक्यातही ५०० पेक्षा अधिक दर आहे. मग तळोदा तालुक्यातील शेतकºयांच्या बाबतीतच का? व्यापारी अडवणुकीचे धोरण घेत आहेत, असा सवाल उपस्थित करून प्रशासनही यात दखल घेत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जिल्हा प्रशासनाने तरी व्यापारी शेतकºयांची बैठक घेऊन केळीच्या दराबाबत निश्चित समाधानकारक तोडगा काढावा, अशी शेतकºयांची मागणी आहे. केळी, पपईच्या वाहतुकीबाबत प्रशासनाने शिथिलतेचे धोरण घेतले आहे, असे असतांना केवळ वाहतुकीच्या अडचणीचे कारण पुढे करून केळी उत्पादकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे शेतकरी म्हणतात. त्यामुळे ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.