शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

‘भगर’ने दिला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 13:09 IST

चकल्या, लाडू, पापडसह खाद्यपदार्थांची निर्मिती

रमाकांत पाटील / आॅनलाइन लोकमतनंदुरबार, दि. २७ - सातपुड्यातील डोंगराळ भागात असलेल्या चढउताराच्या, हलक्या व पाण्याची पुरेशी व्यवस्था नसलेल्या जमिनीत पारंपरिक भगर हे पीक तेथील आदिवासी घेतात. अर्थातच या पिकाला पर्वतीय पीक म्हणून ओळखले जाते. त्या भागातील आदिवासी भादी, बंटी, मोर या नावाने ओळखतात. जवळपास प्रत्येक कुटुंब आपल्याकडे असलेल्या थोड्याफार जमिनीत हे पीक हमखासपणे घेतात.सातपुडा नैसर्गिक भगरची भुरळसातपुड्यातील पारंपरिक पीक म्हणून ओळखले जाणारे ‘भगर’ या धान्याने कात टाकून नव्या रूपात पदार्पण केले असून हे धान्य आता तेथील आदिवासींचे उत्पन्नाचे साधन होऊ लागले आहे. भगर काढणीच्या व्यवसायानेही अनेक महिलांना आधार दिला आहे.वर्षातून साधारणत: दोनवेळादेखील हे पीक घेतले जाते. मात्र हे ते या भागातील आदिवासींनी स्वत:च्या स्वयंपाकगृहापर्यंतच मर्यादित ठेवले होते. अनेक आदिवासी कुटुंबांकडे या पिकाचे उत्पन्न अधिक आल्यास त्याचे ते कणगीत साठवण करून ठेवतात.कृषी विज्ञान केंद्र व महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थांनी सातपुड्यातील पारंपरिक भगर या पिकाचा अभ्यास करून हेच पीक आदिवासींचे उत्पन्नाचे साधन व महिलांना रोजगाराचे साधन बनवून देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांना यशही मिळू लागले असून सातपुड्यातील हेच भगर आता बाहेरील लोकांना ‘नैसर्गिक भगर’ म्हणून भुरळ घालत आहे. नव्हे तर भगरपासून चकल्या, लाडू, पापड, शेवया व इतर खाद्यपदार्थही बनविले जात आहेत.महिला आर्थिक विकास महामंडळाने यासंदर्भातील १५ गावांसाठी एक प्रकल्पही तयार केला असून त्यात जवळपास ८५ बचत गट कार्यान्वित आहेत. या बचत गटांतील ९०० महिला या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. या १५ गावात जवळपास ३२५ एकर क्षेत्रात भगरचे पीक घेतले जात असून भगर काढणीसाठी स्वतंत्र कारखाना महिलांनीच सुरू केला आहे.परिसरातील ९०० महिला भगरचे उत्पादन घेत असून त्या भगरच्या काढणीसाठी कारखाना कार्यान्वित आहे. याठिकाणी महिन्याला पाच ते १० क्विंटल भगर काढणी केली जाते. याबाबत मदुराई (तामिळनाडू) येथे उपपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन ते बनविण्यास सुरुवात केली असून यातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.- रमिला वळवी, राणीकाजल लोकसंचलित साधन केंद्र, मोलगीया भागातील आदिवासी पूर्वी पारंपरिक पद्धतीने भगरची लागवड करीत होते. त्यांना मार्गदर्शन करून त्यात आधुनिकता आणल्याने उत्पन्न वाढले आहे. शिवाय भगर तयार करण्यासाठी लागणारे श्रम कमी करून पक्की भगर निर्मितीसाठी होणाऱ्या तुटीतही घट करण्यात आली आहे. त्यामुळे भगर हे आता आदिवासींचे उदरनिर्वाहाचे साधनही बनत आहे.-राजेंद्र दहातोंडे, समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, कोळदे

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव