शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या स्वउत्पादित बियाण्यांवर भर : कृषी विभागाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

जिल्ह्यात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजलेले आहे. त्यामुळे त्याच्या उगवण क्षमतेवर ...

जिल्ह्यात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजलेले आहे. त्यामुळे त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोयाबीन बियाणाच्या बाजारभावात वाढ झाल्याने शेतकरी हे बियाणे विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. बियाणे उत्पादक कंपन्यांकडून बियाणांचे दर मागील वर्षापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी वाळलेल्या बियाण्यातील शेंगा फोलपटे, काडीकचरा, माती, खडे बाजूला काढून स्वच्छ केलेले बियाणे नवीन गोणपाटात भरून ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता शोषून घेत असल्याने साठवणुकीचे ठिकाण थंड, ओलावाविरहित व हवेशीर असावे. साठवणुकीच्या पोत्याची उंची ७ फुटांपेक्षा अधिक असणार नाही, याची दक्षता घ्यावी. बियाणे १०० किलोच्या पोत्यात भरलेले असल्यास चार पोत्यांपेक्षा जास्त उंची व ४० किलोच्या पोत्यात भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा अधिक थप्पी लावे नये; अन्यथा खालच्या पोत्यातील बियाण्यावर वजन पडून बियाणे फुटण्याची व उगवण शक्ती कमी होण्याची शक्यता असते.

पोत्याची रचना उभ्या- आडव्या पद्धतीने असावी. असे केल्यास हवा खेळती राहून उगवण शक्ती टिकून राहण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार बियाणे साठवलेल्या खोलीत कीटकनाशके व बुरशीनाशकाचा उपयोग करावा. पोत्याची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी केले आहे.