शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

तोडगा निघाल्याशिवाय काम करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : कंपनी आणि शेतकरी यांच्यात तोडगा निघत नाही तोवर पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येऊ नये. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : कंपनी आणि शेतकरी यांच्यात तोडगा निघत नाही तोवर पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येऊ नये. असा निर्णय झालेला असतानाही दडपशाही पद्धतीने कंपनीने काम सुरू केल्याचा आरोप करून शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, अन्यथा संघर्ष पेटेल असा इशारा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत यांनी मंगळवारी दिला.एका खाजगी कंपनीकडून तालुक्यात पेट्रोलियम पाईप लाइन टाकली जात असून त्यासाठी शेतकº्यांना मिळणाºया जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतकरी समाधानी नसल्याने पाईपलाइन टाकण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. नवापूर तालुक्यातून जाणाºया या पेट्रोलियम पाईपलाईन बाबत अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.सी. गावीत यांनी तहसीलदार नवापूर यांना जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत, भाजपाचे जिल्हा चिटणीस एजाज शेख व शेतकºयांच्या उपस्थितीत याबाबत निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, नवापूर तालुक्यातून इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची पेट्रोलियम पाईप लाईन जात आहे. शेतकºयांनी या पाईप लाईनला विरोध दर्शविलेला असून, या संदर्भात तहसील कार्यालयात अनेक वेळा कंपनीच्या अधिकाºयांसमावेत शेतकºयांच्या बैठका झालेल्या आहेत.लॉकडाऊन सुरू होण्याआधी नंदुरबारच्या उपविभागीय अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकरी, कंपनीचे अधिकारी व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी चर्चेत उपविभागीय अधिºयांनी शेतकºयांचा अभिप्राय मागविला होता. तद्नंतर काही दिवसाने कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. परिणामी कंपनीच्या अधिकाºयांंना अद्यापपर्यंत शेतकºयांचे अभिप्राय घेता आले नाही व पुढील सर्व चर्चा थांबली. असे असताना कंपनीच्या अधिकाºयांनी मनमानी करीत गुंडगिरी व दादागिरी पद्धतीने गरीब आदिवासी शेतकºयांंना धमकावून पेट्रोलियम पाईपलाईनचे काम पुन्हा सुरू केले आहे. जोपर्यंत कंपनी आणि शेतकरी यांच्यात तोडगा निघत नाही तोपर्यंत पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येऊ नये असा निर्णय झालेला असताना दडपशाही पद्धतीने कंपनीने काम सुरू केले आहे.शेतकºयांच्या सहनशिलतेचा अंत पाहिला जात आहे. यापुढे जर शेतकºयांच्या जमिनीवर कंपनीने काम चालू केले तर संघर्ष होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही व त्यासाठी संपूर्णत: इंडियन आॅईल कंपनीचे अधिकारी जबाबदार राहतील असे म्हटले आहे. जोवर शेतकरी आणि कंपनीचे अधिकारी यांच्या चर्चेतून मार्ग निघत नाही तोवर सुरू केलेले काम बंद करण्यात यावे अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील व त्यासाठी प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा जिल्हा परिषद सदस्य भरत गावीत, अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आर.सी गावीत यांच्यासह रमेश गावीत काळंबा, दत्तू गावीत कामोद, नथ्थू गावीत काळंबा, विनायक गावीत, भिकन मावची, सतीश गावीत, खलील मुस्ताक ताई, दिलीप गावीत, विजय गावीत, दिलीप मावची, रंजीत गावीत, सलमोन गावीत, भानुदास गावीत, राजू गावीत व असंख्य शेतकºयांनी दिला आहे.एखाद्या प्रकल्पास ५० टक्के लोकांचा विरोध असेल तर तो प्रकल्प केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे होऊ शकत नाही. या प्रकल्पास ९० टक्के शेतकºयांचा विरोध असल्याने या पाईपलाईनचा मार्ग बदलून पहिल्या सर्वेनुसार गुजराथ राज्यातील सोनगडपासून ते महाराष्ट्र राज्याच्या पिंपळनेर पावेतो प्रस्तावित मार्गातून पाईप लाईन काढावी बहुसंख्य शेतकºयांनी सुर आवळला.केंद्र शासनाची पेट्रोलियम पाईप लाईन नवापूर तालुक्यातून जात आहे. या संदर्भात अनेक वेळा अधिकाºयांशी चर्चा झाली आहे. जो पर्यंत कंपनी आणि शेतकरी यांच्यात यशस्वी तोडगा निघत नाही तो पर्यंत पाईप लाईचे काम बंद करण्यात यावे असे ठरले होते. मात्र प्रशासनाची कोणतीही परवागी न घेता कंपनीच्या अधिकाºयांनी दडपशाही पध्दतीने काम सुरु केले आहे. ते काम ताबडतोब बंद करण्यात यावे अन्यथा मोठे जन आंदोलन करण्यात येईल.- भरत गावीत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.