शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

टोकन नसणाऱ्यांना आधी लस दिली जात असल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST

शहरातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सद्या दुसऱ्या डोसच्या नागरिकांना लस ...

शहरातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सद्या दुसऱ्या डोसच्या नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र लसीच्या तुडवड्यामुळे नागरिकांना लस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आपला डोस चुकू नये म्हणून लस घेणाऱ्या नागरिकांची केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. एवढेच नव्हे येथील केंद्र सकाळी नऊ वाजता सुरू होत असताना नागरीक सकाळी आठ वाजल्यापासूनच येत असतात.

शुक्रवारी दुपारी केंद्रावर ज्यांच्याकडे लसीचे टोकन नव्हती अशांना मागच्या दरवाजाने आता प्रवेश देवून लस दिली जात होती. त्यामुळे अधिकृत टोकन असलेल्या नागरिकांनी त्यास मज्जाव केला होता. या प्रकारामुळे चांगलाच वाद रंगला होता. यामुळे प्रचंड गोंधळ देखील उडाला होता. वातावरणही चांगलेच तणावपूर्ण बनले होते. शेवटी रूग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घटना स्थळी दाखल होवून टोकन नसलेल्यांना बाहेर काढले. त्यानंतर उर्वरित लोकांचे शांततेत लसीकरण करण्यात आले. या केंद्रावर लसींचा प्रचंड तुटवडा भासत असल्यामुळे असे चित्र निर्माण होत आहे. तथापि केंद्रावर नियोजनाचा अभावदेखील दिसून आला आहे. कारण नागरिकांना बसण्यास पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे सर्वच एका ठिकाणी गोळा झाले होते. विशेषत: महिलांना देखील जागा अभावी पुरूषांच्या घोळक्यातच उभे राहावे लागल्याचे चित्र होते. अशावेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. लसीकरणा दरम्यान तेथे कोणीही जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे केंद्रावर सावळा गोंधळ दिसून आला होता. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून प्रभावी नियोजनाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे.

केंद्रावरील बंदोबस्ताबाबत पोलिसांची उदासीनता

तळोदा शहरातील नागरिकांना लसिकरणासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात केंद्र उभारण्यात आले आहे. ४० हजाराच्या लोकसंख्येसाठी केवळ एकच केंद्र दिले असल्यामुळे साहजिकच नागरिकांची गर्दी देखील वाढत असते. परिणामी मोठा गोंधळ देखील उडत असतो. या गोंधळात लसीच्या तुटवड्याने अधिक भर घातली आहे. वास्तविक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेवून निदान लसीकरण दरम्यान तरी पोलिसांचा बंदोबस्त लावण्याची आवश्यकता आहे. मात्र, तसे दिसून आले नाही. येथील पोलीस बंदोबस्तासंदर्भात उपस्थित कर्मचाऱ्यास विचारले असता प्रशासनाने पोलीस बंदोबस्तासाठी दोन वेळा पोलीस ठाण्यात पत्र दिले आहे. परंतु अजूनही त्या पत्रावर कार्यवाही करण्यात आलेली नाही. या वेळी पोलिसांनी बंदोबस्ताबाबत उदासीन भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांना शिस्तीने उभे राहण्याचा सूचना कर्मचारी देत असतात. परंतु त्यांचे कोणीच ऐकत नाही,अशी व्यथादेखील या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या वृध्द व महिलांची सुरक्षितता लक्षात घेवून येथे कायम स्वरूपी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.