शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिके जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 11:49 IST

लोेकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून, ...

लोेकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून, बऱ्याच ठिकाणी पिके भुईसपाट झाली आहे. तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात गुरूवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान तळोदा तालुक्यात रात्रीच मुसळधार पाऊस झाला होता. शुक्रवारी दिवसभरात सर्वच तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे.तळोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस        तळोदा तालुक्यात येथे गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास  आलेल्या वादळी पावसाने नर्मदानगर व सरदारनगर या प्रकल्पबाधितांच्या परिसरातील साधारण २५० हेक्टरवरील रब्बी हंगामातील ज्वारी पीक पूर्ण भुईसपाट झाले आहे. यात सरदार सरोवर प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.         तळोदा तालुक्यातील नर्मदानगर व सरदारनगर परिसरात गुरुवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तब्बल दीड तास पावेतो पडलेल्या या वादळी पावसामुळे जवळपास २०० शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील ज्वारी अक्षरशः भुईसपाट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काहींची ज्वारी परिपक्व होण्याचा मार्गावर होती, तर काहींची अजून तोटेच उभे होते. मात्र पावसाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याची व्यथा काही बाधित शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. आधीच सततच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर ही पिके पूर्णतः वाया गेली होती. त्यामुळे उत्पन्नावर झालेला खर्चदेखील निघाला नव्हता. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यातून सावरत शेतकरी पुन्हा रब्बीकडे वळला; परंतु या अवकाळीने पुन्हा त्यांच्या रब्बी ज्वारीचे नुकसान केल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. महसूल व तालुका कृषी प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवातशहादा तालुक्यातील लोणखेडासह परिसरात गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह, व्यावसायिक व नागरिकांची मोठ्याप्रमाणात तारांबळ उडाली. गेल्या आठ दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. हवामान खात्याने ४८ ते ७२ तासात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. परंतु अचानक आलेल्या पावसाने एकच पळापळ सुरू झाली. या पावसामुळे सहा हजारांपर्यंत पोहोचणाऱ्या कपाशीच्या भावावरही परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा पिकावरही परिणाम होण्याची भीती वर्तविली जात आहे. यावेळी मेघगर्जनेसह सुरू झालेल्या पावसाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतमजूर घराकडे           नंदुरबार तालुक्यातील लहान शहादासह परिसरात शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अवेळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह व्यावसायिक व विवाह समारंभात धावपळ उडाली होती. पाऊस सुरू झाल्याने शेतमजूर घरी परतले तर नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावर अनेक मोटरसायकलधारक झाडाखाली थांबून पाऊस उघडण्याची वाट बघत होते. यामुळे रस्त्यावरील झाडांना छावणीचे स्वरूप आले होते.गहू, हरभरा व मिरचीला मोठा फटकानंदुरवार तालुक्यातील बलवंड परीसरात शुक्रवारी संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहेे.  गेल्यादोन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण आणि तपमानात झालेली वाढ पाहता पाऊस पडेल की काय, अशी भिती व्यक्त करण्यात येत होती.  या पावसामुळे रब्बी हंगामाला मोठाफटका बसणार असून, गहु, कांदा व मिरची उत्पादकांना याचा फटका सोसावा लागणार आहेे.वाहन मातीत रूतल्यामुळे तारांबळ शेतकऱ्यांची तारांबळ        सारंगखेडा, ता.शहादा येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत शिवारात ऊस, पपई व केळीची वाहतूक करणाऱ्या वाहने मजुरांकडून भरण्यात आली होती. परंतु अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतात उभी असल्यालीही वाहने बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.हळदाणी परिसरात चाऱ्याचे नुकसान          हळदाणी, ता.नवापूर येथे गुरूवारी रात्री आठ वाजता पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पावसामुळे शेत शिवारात व खळ्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या चाऱ्याचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण होते.

रोगराई पसरण्याची शक्यता            शहादा शहर व परिसरात  शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यावेळी आलेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण होते. परंतु अचानक झालेल्या पावसाने पपई व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पिकांवर रोग येण्याची शक्यता वर्तविली जात असून, शेतकरी ही पिके वाचविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. तसेच आलेल्या पावसामुळे शहरात एकच धावपळ उडाली. ढगाळ वातावरण व आलेल्या पावसामुळे सर्दी, खोकला व ताप यांसारखे आजार वाढण्याची भीती नाकारता येत नाही. हा पाऊस शहरासह ग्रामीण भागातदेखील झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने केळीची तोड बंद असल्याने झाडावरचे केळीचे घड पिकले असून, ती गळून पडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यात भरीस भर म्हणून अचानक आलेला पाऊस शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारा ठरत आहे.

बळीराजा पुन्हा अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यासह परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांसह गुरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकरी पीक जगविण्यासाठी अतोनात परिश्रम घेत असला तरी गेल्या काही वर्षांपासून निसर्गाने बळीराजाला अडचणीत आणल्याचे दिसून येते.    आधीच खरीपात अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीतून सावरत नाही तोच रब्बीतदेखील पावसाने पाणी फिरवल्याने शेतकऱ्यांचा अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गुरूवारी रात्री झालेल्या पावसाने उमराणी बुद्रुक गावातील रमेश जेरमा पावरा या शेतकऱ्याच्या पिकासह परिसरातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा व मका आदी पिकांचेदेखील नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवू द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.धडगाव परिसरात आंबा, चारोळीचे चांगले उत्पन्न मिळत असल्याने सध्या या झाडांना मोहर यायला सुरूवात झाली आहे. मात्र हा अवकाळी पाऊस या झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरदेखील परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.