शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

योग्य भाव न मिळाल्यास पपई तोड बंद करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 1:18 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई उत्पादक संघर्ष समिती व पपई व्यापारी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक शहादा तहसील कार्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पपई उत्पादक संघर्ष समिती व पपई व्यापारी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक शहादा तहसील कार्यालयात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पपईच्या दराबाबत योग्य तोडगा न निघाल्याने २६ जानेवारीपासून पपई तोड थांबविण्याचा निर्णय पपई उत्पादक संघर्ष समितीच्या सदस्यांनी घेतला आहे. पपईला योग्य भाव न मिळाल्यास पपई रस्त्यावर फेकू, असा निर्णयही शेतकऱ्यांनी घेतला आहे.उत्तर भारतात व्यापारी पपई प्रती किलो ४० ते ५० रुपये दराने विक्री करीत आहेत. त्यामानाने शहादा तालुक्यातील पपई व्यापारी हे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देत नाहीत. गेल्या काही वर्षापासून अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी खालावल्याने बागायत शेती करणे शेतकºयांना अवघड झाले आहे. परिणामी मोजकेच शेतकरी पपईची लागवड करीत होते. उत्पन्न कमी निघत असल्याने पपईला व्यापारी योग्य भाव देत होते. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक होते म्हणून पपईचे क्षेत्र वाढून उत्पादनही वाढले आहे. सद्यस्थितीत दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर आदी ठिकाणी थंडीने कहर केला आहे. त्यामुळे या भागात पपईला मागणी वाढली आहे. उत्तर भारतातील बाजारपेठेत पपईला प्रती किलो सध्या ५० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत आहे. शहादा तालुक्यात दोन महिन्यापासून व्यापाºयांनी पपईची तोड सुरू केली आहे. सुरुवातीला २२ रुपये प्रती किलो दराप्रमाणे तोड सुरू केली. मात्र नंतर दर कमी करत करत साडेसात रुपयांपर्यंत आणून ठेवल्याने होणारा विरोध पाहता पुन्हा साडेदहा रुपये किलो दराने तोड सुरू केली. परंतु पपईला किमान १४ रुपये प्रती किलो दर मिळावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.गेल्या काही दिवसापासून पपई उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यात दराबाबत रस्सीखेच सुरू होती. त्यावर योग्य निर्णय व्हावा म्हणून शेतकरी व व्यापाºयांची शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत तहसीलदार कुलकर्णी यांनी सांगितले की, शेतकºयांना कच्चामाल उत्पादन करण्याकरिता आर्थिक व मानसिक या श्रमातून जावे लागते. बºयाचवेळा पिकांसाठी लागलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांच्यात ‘गिव्ह अँड टेक’ याप्रमाणे व्यापार होऊन दोघांमध्ये समन्वय साधून पपई दर निश्चित केले पाहिजे. यात कुणाचेही शोषण होऊ नये, अशी समन्वयाची भूमिका असावी, असे सांगितले. परंतु शेतकºयांनी आम्हाला योग्य भाव मिळाला तरच आम्ही पपई तोड करू देऊ अन्यथा दर निश्चित न झाल्यास २६ जानेवारीपासून पपई तोड बंद करण्यात येईल, असा निर्णय पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, उमाकांत पाटील, हिरालाल माळी, विश्वनाथ पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, ऋषीकेश चौधरी, राजाराम पाटील, गणेश मराठे, जयेश मराठे, मयूर पाटील, योगेश्वर पाटील, महेश सूर्यवंशी, निलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकºयांनी घेतला आहे.