शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाटचारीचे पाणी शेतात शिरल्याने कापूस पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहादा तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र शहराबाहेरुन ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शहादा तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र शहराबाहेरुन गेलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या पाटचारीवर अतिक्रमण केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. हे पाणी पुढे न जाता साचून राहत असल्याने शिरुड शिवारातील शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
खरीप हंगामातील पेरण्या झाल्यानंतर सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके तरारली होती. मात्र १५ दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने पिकांना ताण पडू लागला होता. श्रावण महिना सुरू झाल्यानंतरही पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कवळीथ बंधाºयावरुन शिरुड, टेंभाकडे शहादा शहरातून लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील पाटचारी गेली आहे. या पाटचारीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. या पाटचारीतील पाण्याचा काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना फायदा होत होता. परंतु अनेक लोकांनी या पाटचारीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्यामुळे ठिकठिकाणी पाटचारी फुटल्याने पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. दोन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. पाटचारीचे खोलीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. पाटचारीवर झालेले बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी पाटचारीवर अतिक्रमण केलेल्यांना नोटिसाही दिल्या होत्या. मात्र त्यांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली.
शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाचे पाणी पाटचारीतून न वाहता ते शेतांमध्ये शिरले. शिरुड रस्त्यावर असलेल्या गिरीश पुरूषोत्तम पाटील यांच्या १६ एकरपैकी सहा एकर क्षेत्रात कापसाच्या शेतात हे पाणी शिरल्याने नुकसान झाले. रात्रभर या शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. शनिवारी सकाळी शेतकरी गिरीश पाटील यांनी शेतातील पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरवर्षी पावसाळ्यात शेतकºयांनी ही समस्या सतावत असल्याने व पिकांचे नुकसान होत असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या पाटचारीवर झालेले सर्व अतिक्रमण काढून पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा मोकळी करावी, अशी मागणी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.