शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

इंजेक्शनअभावीच जिल्ह्यात कोरोनाबाधींतांच्या मृत्यूचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात टोसीलाझुमाब व रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात टोसीलाझुमाब व रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची कुठलीही काळजी घेतली जात नाही. या सर्व बाबींची चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. कोविड कक्षातील अनागोंदी आणि असुविधांबाबत तक्रारी होत आहेत. कोरोनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या बाबींची दखल घेऊन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले आहे. पत्रात म्हटले आहे की, नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असून गुजरात व मध्यप्रदेशच्या सिमेवर आहे. दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची, माल वाहतुकीची ये-जा सुरू असते. सद्य स्थितीत नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर देखील वाढला आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू ही चिंतेची बाब ठरली आहे.
जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नाहीत. रुग्ण गंभीर झाल्यावर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्याला जीव गमवावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयाला शासनाकडून कोविड-१९ साठी लागणारे टोसीलाझुमाब व रेमडीसीव्हर हे इंजेक्शन का दिले जात नाही? या बाबीची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे. इंजेक्शन अभावी आणखी किती जणांचे बळी जाऊ देण्याची वाट पहाणार आहात? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. डॉक्टर मंडळी देखील दुर्लक्ष करीत आहेत. रुग्ण व नातेवाईकांच्या या तक्रारी वाढत आहेत.
या सर्व बाबींची आपल्या स्तरावर दखल घेऊन चौकशी करावी, आरोग्य सेवा व आवश्यक इंजेक्शन, औषधी तातडीने उपलब्ध करावी अशी मागणीही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या पत्रात केली आहे.

राजकीय नेता व लोकप्रतिनिधीकडून प्रथमच अशा प्रकारची तक्रार केली गेल्याने त्याकडे गांभिर्याने पाहिले जात आहे. आरोग्य मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनाही याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामुळे कार्यवाहीकडे आता लक्ष लागून आहे.