शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ६० अलगीकरण कक्ष तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:30 IST

लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींवर येथे उपचार करण्यात येणार आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी अलगीकरण कक्षांच्या नियोजनाबाबत ...

लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींवर येथे उपचार करण्यात येणार आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी अलगीकरण कक्षांच्या नियोजनाबाबत गट विकास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एकही बाधित व्यक्ती गावात न फिरता किंवा घरी न थांबता अलगीकरण कक्षात उपचार घेईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. लक्षणे नसलेले कोरोना बाधितांवर वेळेवर उपचार होण्यासाठी फिरत्या पथकामार्फत कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशा नागरिकांना इतर नागरिकांपासून तात्काळ वेगळे करावे, असे निर्देश त्यांनी दिले. सदर सर्व अलगीकरण कक्ष त्या-त्या ग्रामपंचायतीमार्फत चालवली जाणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णाची दिवसातून २-३ वेळा तपासणी करून औषधोपचार करतील. रुग्णांना चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना गावातच किंवा जवळच्या प्राथमिक केंद्राच्या ठिकाणी उपचार मिळणार आहेत.आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी स्वत:हून अलगीकरण कक्षात दाखल झाल्यास इतरांना होणारा संसर्ग टाळता येईल आणि कोरोनावर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. तसेच वेळेवर उपचार झाल्यास बाधित व्यक्तीची प्रकृती अधिक खराब होणार नाही. मंगळवार पर्यंत या कक्षात ५० बेड्सची व्यवस्था करण्यात येणार असून त्यानंतर गरजेनुसार १०० पर्यंत बेड्स वाढविण्यात येणार आहेत. अशाप्रकारे येत्या काळात प्रा.आ.केंद्र स्तरावर सहा हजार बेड्सची क्षमता लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी होऊ शकेल. जिल्हास्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी शेखर रौंदळ यांचेकडे अलगीकरण कक्षाच्या नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली असून आरोग्य विभाग, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रा.पं.सदस्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नियोजनावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक समन्वयक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे अशी माहिती श्री.गावडे यांनी दिली आहे. ग्रामस्थांनी कोरोनाबाधित व्यक्ती अलगीकरण कक्षातच उपचार घेईल यासाठी सहकार्य करावे. तसेच कोरोनामुळे प्रकृतीवर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी ४५ वर्षावरील व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.