शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातला जोडणा:या पुलाचे काम रखडले

By admin | Updated: May 6, 2017 19:00 IST

निर्धारित वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने पुलाचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आह़े

ऑनलाइन लोकमत

कोठार, जि. नंदुरबार, दि. 6 -तापी नदीवरील गुजरात राज्याच्या हद्दीत असणा:या बहुप्रतीक्षित हातोडा पुलाच्या उद्घाटनाच्या संभाव्य तारखेने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आह़े निर्धारित वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने पुलाचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आह़े
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आमदार उदेसिंग पाडवी यांनी बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचा:यांसह हातोडा पुलाची पाहणी केली होती़ त्यावेळी एस.- तीन या स्लॅबचे काम सरू होत़े मात्र पुलाचे पूर्ण काम 15 एप्रिलर्पयत पूर्ण होईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता अनिल पावर व त्यांच्या सहाका:यांनी पुलाच्या पाहणीला आलेल्या आमदार पाडवी व पदाधिका:यांना दिले होत़े त्यांच्या आश्वासनानुसार आमदार पाडवी यांनी कोणत्याही परिस्थितीत मे महिन्याचा पहिल्या आठवडय़ात या पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती  दिली होती़ मात्र मात्र अद्याप याबाबत कुठलीच हालचाल दिसून येत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़ 
पुलाला  सुमारे 58 कोटी 40 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आह़े नदीत असलेल्या पाण्यामुळे पुलाचा कामाची मुदत अनेकदा वाढवून घ्यावी लागली आह़े पुल बांधताना तापी नदीत असलेल्या पाणी साठय़ाचा विचार केला नसल्याचा आरोप करण्यात येत आह़े नदीत पावसाळा व हिवाळ्यात भरपूर पाणीसाठा असतो़ त्यामुळे ठेकेदाराला काम करणेही सोयी नसत़े केवळ उन्हाळ्यातील तीन चार महिने काम करण्यात येत असत़े या कामाचा कालावधी 2009 ते 2011 पावसाळ्यासह देण्यात आला होता़ पुन्हा 2011 ते 2012 असा कालावधी वाढविण्यत आला़ नदीत मोठय़ा प्रमाणात असणा:या पाणीसाठय़ामुळे कामा निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही़ त्यासाठी 3 मार्च 2017 च्या आदेशान्वये 31 मार्चर्पयत सुधारित मुदत वाढविण्यात आली आह़े या उन्हाळ्यात तापी नदीतला पाणीसाठी कमी झाल्यामुळे पुलाचे काम युध्दपातळीवर राबविण्यात आल़े
तळोदा धडगाव तालुक्याला कमी वेळात जोडणारा हा पुल असून यामुळे या भागातील नागरिकांचा वेळ व पैसाही मोठय़ा प्रमाणात वाचणार असल्याने याला मोठे महत्व आह़े तळोदा ते नंदुरबार हे अंतर सुमारे 15 किमीने कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे तळोदा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील गाव व पाडे ही कमी वेळेच्या अंतरात जिल्ह्याला जोडला जाणार आह़े सोबच पुलाच्या पूर्णत्वामुळे दळणवळनाच्या सोयी उपलब्ध होऊन या दोन्ही तालुक्यांच्या औद्योगिक विकासालादेखील चालना मिळणार आह़े