शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

व्ही.सी.द्वारे पडताळणीनंतर कर्करोगावर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गंभीर स्वरुपाच्या मुख कर्करोगांवर उपचारासाठी मुंबई व औरंगाबाद येथील नामांकित रुग्णलयांमार्फत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गंभीर स्वरुपाच्या मुख कर्करोगांवर उपचारासाठी मुंबई व औरंगाबाद येथील नामांकित रुग्णलयांमार्फत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात व्हीडीओद्वेरे संवाद साधला जात आहे. आवश्यतेनुसार या रुग्णांना संदर्भ सेवा दिली जात असून तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहे.मुख कर्करोगामुळे जागतिक स्तरावर आठ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. मृतांमध्ये भारतीयांचे प्रमाण ८० टक्के असल्याने या रोगासाठी भारत राजधानीच ठरतो. तसे नंदुरबार जिल्ह्यातही या आजाराची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कर्करोगाच्या लक्षणांमध्ये सुरवातीला तोंडात पांढरे चट्टे आढळतात. त्याशिवाय लाल चट्टेही आढळून येतात, लाल चट्टा १५ दिवसांपेक्षा अधिक राहिल्यास रुग्णाचे तोंड न उघडण्याची मोठी समस्या निर्माण होते. नंदुरबार जिल्ह्यात तोंड न उघडणाºया मुख कर्करुग्णांमध्ये केवळ पुरूषच नव्हे तर महिलांचाही समावेश आहे.या आजाराचे प्रामुख्याने तीन टप्पे केले जातात, रुग्णाला वाचविण्यासाठी त्याच्यावर पहिल्या व दुसºया टप्प्यातच उपचार होणे आवश्यक आहे. दुसरा टप्पा ओलांडणारा रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल होणºया मुख कर्करुग्णांमधील आजाराची प्रथम मुंबई येथील केईएम, टाटा कॅन्सर हॉस्पिटल व औरंगाबाद येथील शासकीय कॅन्सर हास्पिटलच्या तज्ञ डॅक्टरांमार्फत व्हीडीओद्वारे पडताळणी करण्यात येते, त्यानुसार आजाराचे गांभीर्य लक्षात घेत रुग्णांना या तिन्ही रुग्णालयांमध्ये उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. त्यातून गंभीर स्वरुपाच्या रुग्णांवर मुंबई येथील केईएम, टाटा कॅन्सर हास्पिटल व औरंगाबाद येथील शासकीय कॅन्सर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात येत आहे. नुकतेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमध्ये तळोदा तालुक्यातील रोझवा, कालीबेल व धडगाव येथील एक अशा तिघांचा समावेश आहे. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.