शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गतीमान प्रशासन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी तळोदा पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची सक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गतीमान प्रशासन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी तळोदा पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची सक्ती व बायोमेट्रीक हजेरीच्या निर्णयासह इतर धडाकेबाज निर्णय पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत घेतल्याने निश्चितच त्यांचा अशा विकासाच्या व्हिजनाने तालुक्यातील ग्रामीण जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अन्यथा ‘नव्याची नवलाई’ अशी म्हण ठरू नये.तळोदा पंचायत समितीच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन पदाधिकारी व अधिकाºयांची पहिलीच मासीक सभा घेण्यात आली. एक-दोन सदस्य वगळता सर्वच सदस्य नवीन आहेत. त्यामुळेते अनुभवी आहेत. त्यातही त्यातील बहुतेक जण तरूण आहेत. साहजिकच त्यांच्या कामगिरीबाबत ग्रामीण जनतेमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र या पदाधिकाºयांनी पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय घेत आपल्या कामाची चुनूक दाखवून दिली आहे. कारण बैठकीत गतीमान प्रशासनासाठी कर्मचाºयांची बायोमेट्रीक हजेरी, पंचायत समिती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे, ग्रामविकास आराखड्यासाठी अधिकाºयांचा समन्वय, विभाग प्रमुखांची सक्तीची उपस्थिती, कागदी घोड्याऐवजी कामांची प्रत्यक्ष कृती, कामचुकारांवर कारवाई अशा वेगवेगळ्या निर्णयांबरोबरच आदिवासी विकास प्रकल्पांच्या योजनांच्या आढाव्यासाठी तेथील अधिकाºयांना बैठकीस सक्ती करून असे धोरणात्मक विषय घेण्यात आले.साहजिकच पदाधिकाºयांच्या या निर्णयाने तालुक्यातील ग्रामीण जनतेने समाधान व्यक्त केले आहे. तथापि त्याची प्रभावी व कडक अंमलबजावणी करण्याची अपेक्षादेखील व्यक्त केली जात आहे. कारण लाभार्थ्यांना विविध योजनांच्या कामांसाठी सतत हेलपाटे मारावे लागत असल्याचा वाईट अनुभव आहे. कर्मचारी कार्यालयात टेबलावर सापडत नसल्याचा आरोप आहे. त्यांना शोधण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागत असल्याच्या प्रकारालाही तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. आता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रीक हजेरी यामुळे निश्चितच कामचुकारपणा दूर होऊन प्रशासनात गतीमानता येवून लोकांची कामे होतील. विशेषत: आदिवासी प्रकल्पाच्या योजना व अधिकाºयांमधील समन्वय यामुळे योजनांना गती येईल.या सर्व पार्श्वभूमिवर पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाºयांनी घेतलेले हे निर्णय निश्चितच तालुक्याचा विकास आणि प्रशासनातील उदासिनता दूर होण्यासाठी निश्चितच फलदायक आहे. परंतु त्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी त्यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा नव्याची नवलाई अशी आरूढ झालेली म्हण ठरु नये.