शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

...आणि मंत्र्यांचा ताफा जाताच दुकाने खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 13:10 IST

जितेंद्र गिरासे । लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने कृषी सेवा केंद्र अत्यावश्यक सेवेप्रमाणेच सुरू ...

जितेंद्र गिरासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने कृषी सेवा केंद्र अत्यावश्यक सेवेप्रमाणेच सुरू ठेवावे, असे प्रशासन भूमिका घेत असली तरी सारंगखेड्यात मात्र मंगळवारी त्याचा उलटा अनुभव आला. कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा दौरा या भागातून जाणार असल्याने त्यांचा धसका घेऊन येथील कृषी सेवा केंद्र चालकांनी तब्बल सहा तास दुकाने बंद ठेवली होती. मंत्र्यांचा ताफा परतताच मात्र दुकाने पूर्ववत सुरू झाल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला.
कृषीमंत्री दादाजी भुसे हे मंगळवारी धुळे येथून सारंगखेडामार्गे कहाटूळ येथे जाणार होते. मंत्री भुसे हे सारंगखेडामार्गे जाणार असल्याची माहिती कळाल्यावर येथील रासायनिक खते व बी-बियाणे विक्रेत्यांनी दुकाने बंद केल्याने त्याबाबत दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काही दिवसांपूर्वी साध्या वेशात व मोटारसायकलीने जात काही ठिकाणी रासायनिक खते विक्रीच्या दुकानांना भेटी देत शेतकऱ्यांना खते न देणाºया विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मंगळवारी मंत्री भुसे हे सारंगखेडामार्गे मोटारीने कहाटूळ येथे जाणार होते. ते कदाचित येऊन आपल्या दुकानाची तपासणी करतील की काय या धास्तीमुळे तर येथील रासायनिक खत विक्रेते व बी-बियाणे विक्रेत्यांनी दुपारी दोन वाजताच दुकाने बंद केली नाहीत ना? अशी चर्चा येथे दिवसभर होती.
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी सध्या जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर ही चार प्रमुख शहरे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. मात्र या चारही ठिकाणी सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत रासायनिक खते, बी-बियाणे, किटकनाशके विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तसा निर्णय ग्रामपंचायत हद्दीत नसतानादेखील मंगळवारी नेमका राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या दौºयामुळे दुकाने बंद असल्याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. यात दुकाने बंद करण्याबाबत नेमकी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दुकानदारांना सूचना केली की दुकानदारांनी स्वत:हून आपली दुकाने बंद केली याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दुकाने बंद असल्याने अनेक शेतकरी दुकानांसमोर उभे असल्याचे चित्र या वेळी पहावयास मिळाले.
दरम्यान, कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा ताफा परतताच येथील कृषी सेवा केंद्र पूर्ववत सुरू झाल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला.