शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

रस्ते महामंडळ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:55 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहादा प्रांताधिकारी यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले. तसेच आश्वासन प्रांताधिकारी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहादा प्रांताधिकारी यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले. तसेच आश्वासन प्रांताधिकारी यांनी प्रकाशा येथील शेतकरी, व्यापारी, वाहनधारकांना दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या. सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा या दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यात प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान दोन वर्षापासून रस्त्याचे काम अपूर्ण आहे. अपूर्ण कामामुळे   रस्ता पूर्णतः खराब झाला असून जागोजागी खड्डे  पडून रस्त्यावर धूळ उडते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांवर धूळ उडून उत्पन्नात घट येत आहे. प्रकाशा व डामरखेडा येथील पुलावरही खड्डे पडले आहेत. या सर्व तक्रारींचे निवारण करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची होती.  बुधवारी सायंकाळी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या कार्यालयात रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, आंदोलनकर्ते व तहसीलदार यांच्यात बैठक झाली. त्यात रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बोरसे, सहायक अभियंता वानखेडे, ठेकेदार, शेतकरी हरी पाटील, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, आदी उपस्थित होते. रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपामध्ये मागण्या मान्य केल्या व तातडीने काम करण्याचे लेखी आश्वासन प्रांताधिकाऱ्यांना दिले. असेच आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी प्रकाशा येथील व्यापारी, आंदोलनकर्ते शेतकरी यांना दिल्यानंतर गुरुवारी होणारे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. हे सर्व रस्ते तात्काळ पूर्ण करावे, असे सांगितले. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे  धुळीमुळे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. कोकणीमाता ते डामरखेडा पुलापर्यंतचा पूर्ण मार्ग डांबरीकरण करावा, प्रकाशा व डामरखेडा  येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी, ज्या ठिकाणी अपूर्ण काम आहे ते तात्काळ पूर्ण  करण्यात यावे, नवीन रस्ता व जुना रस्ता यामध्ये जे अंतर आहे ते व्यवस्थित करून द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. त्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत.

प्रकाशा येथे चौपदरीकरण व्हावेकोळदा  ते सेंधवा हा मार्ग काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या  मार्गावरील लहान शहादे, डामरखेडा, करजई, बुपकरी, लांबोळा, मनरद   या सर्वच गावांना  चौपदरीकरण आहे.  मध्यभागी विजेचे खांब आहेत व आजूबाजूला संरक्षक लोखंडी कठडे, गटारी आहेत. मग अशा प्रकारचा रस्ता प्रकाशा येथे का करण्यात आला नाही.  प्रकाशा येथे तीर्थक्षेत्र आहे. तीन राज्य व दोन तालुक्यांना जोडणारे महत्वपूर्ण गाव आहे. भाविकांची वर्दळ असते. म्हणून प्रकाशा येथे चौपदरीकरण करणे गरजेचे असताना प्रकाशा गावाला का डावलण्यात आले? असा प्रश्न आंदोलनकर्ते व हरी पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. त्यावर या अधिकाऱ्यांनी आम्ही वरिष्ठांना विचारतो व सर्वे करण्याचा प्रयत्न करतो, असे सांगितले.