शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यात २१० आकडेबहाद्दरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाने गेल्या एका महिन्यात आकडी टाकून वीज चोरी करणाऱ्या २१० ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाने गेल्या एका महिन्यात आकडी टाकून वीज चोरी करणाऱ्या २१० जणांवर कारवाई केली़ कंपनीने सातत्याने केलेल्या कारवायांमुळे वीज चोरी कमी झाल्याचा दावा केला असून येत्या काळातही कारवाई सुरु राहणार असल्याने वीज चोरांंचे धाबे दणाणले आहे़वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागात धडगाव, तळोदा, अक्कलकुवा आणि शहादा हे चार तालुके समाविष्ट आहेत़ येथील तब्बल ६७ हजार ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत़ गेल्या काही वर्षात वीज चोरीवर आळा घालण्यासाठी कंपनीकडून वेळावेळी गावांमध्ये भेटी देऊन वीज जोडणी घेण्याबाबत आवाहन केले जात आहे़ यानंतरही काही ठिकाणी वीज चोरीचे प्रकार उघडकीस येत असल्याने कंपनीकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे़ यातून दंडाची वसुली करुन वीज चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ या कारवाईमुळे चारही तालुक्यातील वीज गळती कमी होऊन समतोल दाबाने वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे़ एकीकडे कारवाई सुरु असताना घरगुती आणि कृषीपंपांच्या थकबाकीबाबतही कंपनीकडून कारवाई होण्याचे संकेत देण्यात आले आहेत़तत्कालीन सरकारने कृषी क्षेत्रात वापरल्या गेलेल्या वीज बिलाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता़ हा निर्णय काही कालावधीपुरताच होता़ यामुळे येत्या काही दिवसात कृषीपंपांच्या वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे़ यातून ुपुन्हा शेतकरी आणि वीज कंपनी असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ यावर तोडगा म्हणून शासनाने शेतकऱ्यांकडे थकीत असलेले वीज बिल माफीची कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे़४कंपनीने १ ते ३१ जानेवारी दरम्यान शहादा विभागात २१० जणांवर कारवाई करुन ३५ लाख रुपयांचा दंडही वसुल केला आहे़ दरम्यान २०१९ च्या अंतिम सहा महिन्यात कंपनीने १ हजार ३७५ जणांवर कारवाई करुन तब्बल दोन कोटी रुपयांची वसुली केल्याची माहिती देण्यात आली आहे़ दिवसेंदिवस कारवाईचा वेग वाढत असल्याने चारही तालुक्यातील वीज गळती कमी झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे़४चारही तालुक्यांमध्ये तब्बल ६७ हजार घरगुती ग्राहक आहेत़ यातील किमान २० हजार ग्राहकांकडे तीन ते चार कोटी रुपयांची वीज थकबाकी आहे़ दीर्घमुदत थकबाकीची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी कंपनीकडून यंदा थकबाकीदारांच्या भेटी घेऊन वसुलीसाठी प्रयत्न सुरु आहेत़ कारवाई करुन वसुली करण्यापेक्षा कंपनीकडून सांमजस्याने वसुली करण्यावर अधिक भर दिला जात आहे़४विभागातील चार तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य त्या क्षमतेचे ट्रान्सफार्मर देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याची माहितीही कंपनीने दिली आहे़ विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यात चारही तालुक्यातील कोणत्याही गावात ब्लॅक आऊटसारखे प्रकार घडलेला नसल्याचाही दावा त्यांच्याकडून केला जात आहे़४एकीकडे घरगुती वीज चोरी करणाºयांवर कारवाई होत असताना २६ हजार ७७५ कृषीपंप धारकांच्या अडचणींकडे लक्ष देण्याची मागणी आहे़ शहादा विभागात कृषीपंपधारकांकडे तब्बल ४१२ कोटी रुपयांचे वीजबील थकीत आहे़ या थकबाकीसाठी कंपनी प्रयत्नशील आहे़ परंतू शेतकºयांनी दीर्घकाळापासून असलेली ही बिले अंदाजित असल्याने शासनाकडून बिलांना माफी देण्यात यावी असा आग्रह धरला आहे़ शहादा आणि तळोदा या दोन तालुक्यातील बागायत शेतकºयांना गेल्या काही वर्षात अंदाजित बिले दिल्यामुळे त्यांच्याकडील थकबाकीचा आकडा हा फुगला आहे़ कंपनीकडे शेतकºयांनी काही अंशी भरणा केला असला तरी पुन्हा तीच गत झाल्याने आकडे फुगल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़