शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१९० कोटी खर्चून निर्माण झाले ३४ लाख टीसीएम पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 21:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : २०१५ मध्ये सुरू झालेले जलयुक्त शिवार अभियान मार्च २०२० पासून बंद करण्यात आले आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : २०१५ मध्ये सुरू झालेले जलयुक्त शिवार अभियान मार्च २०२० पासून बंद करण्यात आले आहे़ राज्यातील सर्व यंत्रणांनी सर्व कामे पूर्ण केल्याचे गृहित धरून शासनाने ही योजना बंद केली आहे़ तब्बल पाच वर्षे सुरू असलेल्या या अभियानात जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी १९० कोटी रूपयांचा खर्च करुन ३४ लाख टीसीएम पाणीसाठा निर्माण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे़
२०१५ या वर्षात नंदुरबार ७२ गावांची निवड करत त्याठिकाणी विविध जलसंधारणाच्या कामांची सुरूवात केली होती़ यांतर्गत सुमारे ४९२ कामे कृषी विभाग, लघुसिंचन विभाग, जलसंधारण विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि भूजल सर्वेक्षण विभाग यांच्याकडून सुरू करण्यात आली होती़ यात नंदुरबार सात गावांमध्ये १०९ कामे, धडगाव ३ गावांमध्ये ५८ कामे, नवापूर ३२ गावांमध्ये ९४, शहादा १६ गावांमध्ये ८३ तर अक्कलकुवा तालुक्यात १२ गावांमध्ये १४८ कामांना सुरूवात करण्यात आली होती़ ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आल्यानंतर २०१६ या कामांना वेग येऊन ४२५ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचे पाणी पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे़ पाणलोट विकास कार्यक्रम, गॅबियन बंधारे, अनघड दगडी बांध, नैसर्गिक जलस्त्रोत बळकटीकरण, वनीकरण, वृक्षलागवड, सिमेंट नाला बांध, कंपार्टमेंट बंडीग, मातीनाला बांध, गाळ काढणे, नाला खोलीकरण, कोल्हापूर टाईप बंधारा, साठवण बंधारा, जुन्या जलस्त्रोतांची दुरूस्ती, खोल सलग समतल चर, लहान मातीचा बांध, मजगी यासह विविध जलसंधारणाची कामे गेल्या पाच वर्षात पूर्ण करण्यात आली आहेत़ ही कामे पूर्ण करणाऱ्या यंत्रणांनी कृषी विभागाकडे तसा अहवाल देऊन कामांची माहिती दिली आहे़ यातून निर्माण झालेल्या पाण्यातून भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा विविध यंत्रणांनी केला आहे़

२०१५-१६ ते २०१८-१९ या वर्षात कृषी विभाग, लघुसिंचन विभाग, जलसंधारण विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग यांनी मिळून ४२५ गावांची निवड केली आहे़ यात ९ हजार २३६ कामे हाती घेण्यात आली होती़ यासाठी जिल्हा नियोजनसह विविध यंत्रणांनी २६७ कोटी ९३ लाख रूपयांचा निधी मंजूर करुन दिला होता़ या निधीतून सर्व ९ हजार २३६ कामे आजअखेरीस पूर्ण करण्यात आल्याचा दावा या सर्व यंत्रणांकडून करण्यात आला असून यासाठी १९० कोटी ८ लाख ९४ हजार रूपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे़ खर्च करण्यात आलेल्या निधीतून तयार झालेल्या जलसंधारणाच्या कामातून ३४ लाख ३६८ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातून भूजल पातळी दीड मीटरपर्यंत स्थिर आहे़

जिल्ह्यात पूर्ण ९ हजार कामांचा आढावा दर वर्षाला घेण्यात येणार आहे़ दरम्यान जलयुक्त शिवार अभियान हे केवळ पाच वर्षांसाठी होते़ एप्रिल २०१९ ही त्याची शेवटची मुदत होती़ परंतु बरीच कामे अपूर्ण असल्याने त्याला मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ दिली गेली़ मुदत वाढ मिळाल्याने बरीच कामे पूर्ण करण्यात आल्याने जिल्ह्यातील ही योजना पूर्णपणे गुंडाळण्यात आली आहे़


३१ मार्च २०२० रोजी अभियान पूर्ण झाले आहे़ जिल्ह्यातील सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ कामे पूर्ण झाली असल्याची दर वर्षाला तटस्थ यंत्रणा तपासणी करणार आहे़ याचा अहवाल विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात देवून कार्यवाही सुरू राहील़
-निलेश भागेश्वर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नंदुरबाऱ